आखिल भारतीय साहीत्य सम्मेलनाच्या संयोजन समितीला डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा विसर

९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे संपन्न होत असून या संमेलनात विविध साहित्यिक, गायक, कवी तसेच राजकीय नेत्यांची नावे कार्यक्रम स्थळाला देण्यात आले.
Dr Shivajirao Patil Nilangekar
Dr Shivajirao Patil Nilangekarsakal
Summary

९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे संपन्न होत असून या संमेलनात विविध साहित्यिक, गायक, कवी तसेच राजकीय नेत्यांची नावे कार्यक्रम स्थळाला देण्यात आले.

निलंगा - ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (akhil bhartiy marathi sahitya sammelan) उदगीर (Uadgir) येथे संपन्न होत असून या संमेलनात विविध साहित्यिक, गायक, कवी तसेच राजकीय नेत्यांची नावे कार्यक्रम स्थळाला देण्यात आले. मात्र लातूर जिल्ह्याचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (Dr Shivajirao Patil Nilangekar) यांच्या नावाचा विसर मात्र या साहित्य संमेलनाच्या कमिटीला पडला असल्याची चर्चा सध्या निलंगा तालुक्यात व शहरात चवीने चर्चिली जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे आणि मान्यवर यांनी विशेष लक्ष घालून हे संमेलन कसे यशस्वी होईल यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. उदगीर सारख्या महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरच्या तालुक्यावर हे संमेलन होत असून याबाबत सर्वांनाच उत्सुकता आनंद होत आहे. या संदर्भात अनेक वेळा बैठका संपन्न झाल्या अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

या संमेलनासाठी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, छत्रपती शाहू महाराज सभामंडप, कलामहर्षी बाबुराव पेंटर कला मेळा, शांताबाई शेळके कविकट्टा, सिकंदर अली सभाग्रह, डॉ. ना. य. डोळे, हुतात्मा भाई शामलाजी व्यासपीठ, संग्रमआप्पा शेटकार, देवीसिंह चौव्हान, लोकनेते विलासराव देशमुख सभागृह, त्र्यंबकदासजी झंवर, अदीसह साहित्यिक, कलाकार ,राजकीय नेते, जिल्ह्यातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या नावे या साहित्य संमेलनांमध्ये सभागृह, कार्यक्रमाचे स्थळाला नाव, प्रवेशद्वार मान्यवरांची नावे देण्यात आली मात्र लातूर जिल्हा निर्मितीचे शिल्पकार तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नाव मात्र या साहित्य संमेलनाच्या पत्रिकेवर वगळले असल्याचे दिसून येते. सभागृहाला प्रवेशद्वाराला कार्यक्रम ठिकाणी कुठेही उल्लेख नसल्याने या साहित्य संमेलनाच्या कमिटीला डॉ. निलंगेकर यांचा विसर पडला की काय? अशी चर्चा सध्या निलंगा तालुक्यात चर्चिली जात आहे.

विशेष बाब म्हणजे दहा वेळा आमदार, एक वेळा मुख्यमंत्री, अनेक वेळा कॅबिनेट मंत्री पद भूषविलेल्या डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मराठवाडा तसेच महाराष्ट्राचे मोठ्या दिमाखात नेतृत्व केले. राजकारणातील संत म्हणून संबोधल्या जाणाऱ्या डॉ. निलंगेकर हे साहित्यातही मागे नव्हते त्यांनी मराठवाडा- हैदराबाद मुक्तिसंग्रामवर प्रबंध सादर करून पीएचडी मिळवली व त्या पुस्तकात परिवर्तित करून प्रकाशन करण्यात आले. तर त्यांच्यावर तेरणा काठचा सोनहीरा - १) डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, २) निष्ठावंत नेतृत्व - डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर, ३) वैभव तेरणेचे - डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, ४) महाराष्ट्राचे लोकनेते - डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे ग्रंथ डॉक्टर निलंगेकर यांच्यावर व त्यांच्या जीवनावर प्रकाशित झाले आहेत. यातील बरीच पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. त्यामुळे साहित्यातही अग्रेसर असणारे निलंगेकर आज पडद्याआड गेले असले तरीही त्यांच्या अनेक आठवणी महाराष्ट्राला आहेत मात्र या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या त्यांच्या नावाचा निश्चितच विसर पडला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

याबाबत संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांना संपर्क साधला असता ते म्हणाले आमच्या लक्षात न आल्यामुळे डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नाव राहून गेले असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com