Coronavirus : उस्मानाबादेत चोवीस तासात १७ जणांना कोरोनाची लागण 

corona.jpg
corona.jpg

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये रविवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये १७ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी ही संख्या १९ होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यातही एकाच दिवसामध्ये १७ लोकांना कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाबाधित रुग्णाची संख्या ३५४ वरुन ३७१ वर गेली आहे. त्यामध्ये शहरातील महादेव गल्लीमध्ये एकजण आढळला आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
गेल्या काही दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये कोरोनाचा विळखा अधिक वाढताना दिसत आहे. त्यातही उमरगा येथील मयत झालेल्या एकाचा अहवाल पॉझीटिव्ह आल्याने जिल्ह्यामधील मयताची संख्या आता १५ वर पोहचली आहे. शिवाय तुळजापुर तालुक्यातील एकाचा पुण्याच्या खाजगी रुग्णालयात एकाचा मृत्यु झाल्याने त्याचीही नोंद जिल्ह्यातच झाली आहे. 

जिल्ह्यामध्ये सध्याच्या स्थितीला आठ हजार ८०५ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यातील चार हजार ७२० लोकांचे १४ दिवस पुर्ण झाले आहेत. तर संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्या लोकांची संख्या पाच हजार १०७ इतकी आहे. त्यातील चार हजार १५१ लोकांचा १४ दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तर ९५६ अजुनही संस्थात्मक क्वारंटानईमध्ये दाखल आहेत. शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये जिल्ह्यातील १९ लोकांचे अहवाल पॉझीटिव्ह आल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे रविवारी प्राप्त होणाऱ्या अहवालाकडे अनेकांचे लक्ष लागलेले होते.

रविवारी सकाळी अहवाल प्राप्त झाले असून त्यातही १७ लोकांना कोरोनाची लागन झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये कोणत्या भागातील किती याची माहिती अद्याप मिळालेली नसली. तरी जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या अहवाल हे दुहेरी आकड्यातच येत असून ही नक्कीच चिंताजनक बाब आहे.

जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला असून तो थांबविणे आता प्रशासनाच्याही हाताबाहेर गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने संचारबंदीचा निर्णय घेतलेला असला तरी त्याचाही किती परिणाम होणार याविषयी शंका व्यक्त होत आहे. बाहेरुन येणाऱ्या लोकांची माहिती ठेवण्याची व्यवस्था प्रशासनाकडे नसल्याने त्याचाही रुग्णवाढीवर परिणाम होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ सूरु आहे. पण त्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. लोकामध्ये बाहेरुन आल्यानंतर नियमानूसार क्वारंटाईन होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

शेजारी असलेल्या सोलापूर, बार्शी, वैराग, लातूर आदी ठिकाणी कोरोनाचा कहर चालू असल्याने रेड झोनमध्ये येणे-जाण्याचे प्रमाण अजूनही तेवढ्याच प्रमाणात सूरु असल्याचे चित्र आहे. साहजिकच रुग्णवाढीवर त्याचा चांगलाच परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे संचारबंदी ऐवजी जिल्हाबंदी कऱण्याबाबत प्रशासनाकडून अधिक लक्ष्य देण्याची आवश्यकता असल्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.

संपादन : प्रताप अवचार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com