बागलवाडी प्रकल्पातून बेसुमार उपसा सुरूच

file photo
file photo

पाथरूड (जि. उस्मानाबाद) : परिसरातील बागलवाडी प्रकल्पामध्ये पाच टक्के पाणीसाठाही उपलब्ध नसताना शेतीसाठी बेसुमार उपसा सुरू असल्याने पाणीप्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्यात उपलब्ध पाणीसाठ्याचा उपसा झाल्यामुळे तीव्र पाणीटंचाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तलावातील शेतीसाठी होणारा पाण्याचा उपसा थांबविण्याचे आदेश संबंधित खात्याला दिले होते.

परिसरातील पाथरूड, उमाचीवाडी, अंतरवाली प्रकल्पांतील पाणीसाठा पाच टक्केही नाही. एप्रिल महिन्यातही तलावातील पाणी उपसा सुरूच आहे. पाणी उपसा करणाऱ्या वीजपंपांचा वीजपुरवठा खंडित केलेला नाही. पाटबंधारे विभागाने पाण्याचा उपसा रोखण्यासाठी अद्यापही भरारी पथकाची नेमणूक केली नाही. बागलवाडी प्रकल्पामधून पाथरूड, बागलवाडी या गावांसाठी ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा केला जातो.

उमाचीवाडी प्रकल्पातून उमाचीवाडी व वडाचीवाडी गावांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. अंतरवाली येथील प्रकल्पातून अंतरवाली, नळी, वडगाव, गिरलगाव येथे पाणीपुरवठा होत आहे. पाथरूड येथील प्रकल्प गावाशेजारी असल्यामुळे पशुधन व वन्यप्राण्यांसाठी पाणी राखीव असणे गरजेचे आहे.

भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रकल्पातील पाणी उपसा थांबविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. या तलावातून होणारा बेसुमार पाणी उपसा थांबला नाही तर काही महिन्यांतच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com