Osmanabad : अनेक गावांत शिरले पुराचे पाणी

हेलिकॉप्टरने मदतकार्य, १९ जणांना बाहेर काढले
osmanabad
osmanabadsakal

उस्मानाबाद : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने मांजरा, तेरणा नदीने पात्र सोडले असून काठच्या गावांमध्ये पाणी घुसले आहे. एनडीआरएफच्या पथकाने हॅलिकॉप्टरने मदतकार्य केले. वाकडी-इस्थळ (ता. कळंब) येथील १९ जणांना बाहेर काढले. सोंदणा (ता. कळंब) येथील पूरस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. दाऊतपूर (ता. उस्मानाबाद) येथील नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दरम्यान, जीवित हानी नसली तरी पावसामुळे खरीप पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अनेक घरांची पडझड झाली.

जिल्ह्याच्या इतिहासात अनेक वर्षांनंतर तेरणा, मांजरा नद्यांनी पात्र सोडले असून, शेत आणि शिवारातून पाणी वाहत आहे. सकाळी बहुतांश पुलावर पाणी असल्याने जनजीवन ठप्प झाले असून, काही गावांचा संपर्क तुटला आहे.

ग्रामस्थ सुरक्षितस्थळी

उस्मानाबाद तालुक्यात तेरणा नदीकाठच्या तेर, रामवाडी, इर्ला आणि दाऊतपूर गावात तसेच कळंब तालुक्यातील मांजरा नदीकाठच्या वाकडी (इ), सौदणा आदी गावात पाणी घुसले. तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पाऊस थांबल्याने पाण्याची पातळी कमी होत आहे. दरम्यान, पावसाच्या शक्यतेने परिसरातील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. महापुराने नदीकाठच्या शिवारातील सोयाबीनचे पीक चिखलाखाली गेल्याचे चित्र आहे.

एनडीआरएफकडून रेस्क्यू ऑपरेशन

वाकडी (ता. कळंब) येथ मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाचे अधिकारी सोंदणा (ता. कळंब) येथे असून, तेथे अडकलेल्या नागरिकांनाही बाहेर काढण्याची प्रयत्न सुरू आहेत. तर एनडीआरएफची तुकडी दाऊतपूर (ता. उस्मानाबाद) येथे आली असून नदीच्या पात्रात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हॅलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com