परभणी जिल्ह्यातील ५४३ शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाची अंमलबजावणी
agricultural schemes
agricultural schemes sakal

परभणी : जिल्ह्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विविध कृषी योजनांचा शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी २०२१ ते २०२३ या तीन वर्षांसाठी कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या अंतर्गत ५४३ शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातील काही शेतकऱ्यांना लाभही मिळालेला आहे.

जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आदी पारंपारिक पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. परंतु, या पारंपारिक पिकांसोबतच फळबागांची लागवड वाढावी, या उद्देशाने शेतकऱ्यांना विविध अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक लाभ दिला जात आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत २०२१ ते २३ या वर्षांसाठी जिल्ह्यातील ५४३ लाभार्थांना शेततळे, कांदा चाळ व फळबागांना अनुदान देण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये आतापर्यंत कांदा चाळीसाठी २२६, सामूहिक शेततळ्यासाठी ५ तर फळबागेचे पुनर्नियोजन करण्यासाठी ६ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच लाभ दिला जाणार आहे.

कांदा चाळीसाठी अर्ज मागविले

कांदा चाळीसाठी ८७ हजार ५०० रुपये, संत्रा बागेसाठी ६० हजार रुपये तर सामूहिक शेततळ्यासाठी १६ लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कांदा चाळ व फळबागेसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com