परभणीचा मोंढा गजबजला

mondha
mondha

परभणी : अतिवृष्टीमुळे बाजार समितीमधील बंद पडलेले खरेदी-विक्री व्यवहार पुन्हा सुरळीत झाले असून परभणीच्या मोंढ्यात शेतकऱ्यांची गर्दी सुरु झाली आहे. रब्बी पेरणीसाठी लागणारे खते, बियाणे खरेदीसह अतिवृष्टीतून वाचवलेले पिक घेऊन शेतकरी मोंढ्यात येत आहेत. त्यामुळे मोंढ्यातील उलाढाल पुन्हा सुरु झाली आहे.


जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल महिनाभरापासून सर्वच व्यवहारावर गंभीर परिणाम झाला होता. सोयाबीनची कापनी सुरु असतानाच पावसाने धुमाकुळ घातल्याने शेतकऱ्यांना उभ्या आणि कापलेल्या सोयाबीनवर पाणी सोडावे लागले. ज्यांनी कापनी करुन व्यवस्थीत सुड्या उभ्या करत झाकले अशा सुड्यांची आता मळणी सुरु झाली आहे. बहुतांष अजुनही शेतात ओलावा असल्याने त्याठिकाणी यंत्र जात नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. ज्यांच्याशेतात यंत्र जात आहेत असे शेतकरी पटापट सोयाबीनची मळणी करत आहेत.
ज्यांचे उभे सोयाबीन होते ते आता थेट पाळी घालत आहेत. काहींचे ढिगारे देखील भिजल्याने बुरशी लागलेले सोयाबीन बाजारात आणले जात आहे. बुरशी लागलेल्या सोयाबीनला १५०० हजार रुपयापासून दर मिळत आहे. शेतकरी हाती लागेल तसे सोयाबीन मोंढ्यात आणत आहेत. एकीकडे वाचवलेले सोयाबीन काढून लवकर विक्रीची घाई आणि दुसरीकडे रब्बी पेरणीची घाई अशा दुहेरी गडबडीत शेतकरी सापडले आहेत.


रब्बी पेरणीसाठी लागणारे ज्वारी, गहु, हरबरा, करडई यांच्या बियाणासाठी शेतकरी मोंढ्यात गर्दी करत आहेत. तसेच चारा पिके, फळभाज्या आदींचे बियाणे विक्री होत आहे. सर्वाधीक विक्री ही खतांची होत आहे. खत खरेदीसाठी शेतकरी मोंढ्यात येत असून त्यासोबतच तणनाशक फवारणीचे औषधांची देखील मोठी विक्री होत आहे. मंगळवारी (ता.१२) येथील मोंढ्यात मोठी गर्दी उसळली होती. खते, बियाणांच्या दुकानावर गर्दी झाली होती. खरिप हंगामात जुन महिण्यात परभणीचच्या मोंढ्यात गर्दी झाली होती. त्यानंतर रब्बी हंगामात ऑक्टोबर महिण्यात नुकतीच गर्दीला सुरुवात होताच पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे पिकांची काढणी थांबली आणि पेरण्याही थांबल्या. त्यामुळे ता.२० ऑक्टोबरपासून मोंढ्यात शुकशुकाट निर्माण झाला होता. अनेक दिवसानंतर मोंढा गजबजलेला पाहयला मिळाला.


३४ हजार मेट्रीक टन खत शिल्लक
अतिवृष्टीतून सावरत जिल्ह्यातील शेतकरी रब्बीच्या पेरणाला लाहले असून त्यासाठी बाजारपेठेत खत आणि बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे. दरम्यान, ३४ हजार मेट्रीक टन खत शिल्लक आहे. जिल्ह्याला रब्बी हंगामात ५५ हजार ३० मेट्रीक टन खत मंजूर झाला आहे. त्यापैकी १५ हजार ८९० मेट्रीक टन खताची आवक झाली असून खरीप हंगामातील २५ हजार २७ मेट्रीक टन खत शिल्लक आहे. जवळपास ४० हजार ९१७ मेट्रीक टन खतापैकी सहा हजार ६० मेट्रीक टन खताची विक्री झाली असून ३४ हजार ८५७  मेट्रीक टन खत शिल्लक आहे, अशी माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
.......

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com