औरंगाबाद - ""सतत सूचना देत राहिल्याने मूल तुमचे ऐकणे बंद करते. न ओरडता, एकदा व्यवस्थित समजावून सांगितल्यावर मुले आई-वडिलांचे ऐकतात. मुलांवर ओरडण्यापेक्षा सांगण्याची पद्धत बदला,'' असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी पालकांना दिला.
"सकाळ माध्यम समूह' आणि "महिला मंडळ, औरंगाबाद' यांच्यातर्फे शनिवारी (ता. 26) विद्यार्थी आणि पालकांसाठी खास कार्यशाळा घेण्यात आली. औरंगपुऱ्यातील शिशुविहार शाळेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यशाळेला सुमारे साडेचारशे विद्यार्थी आणि दीडशे पालकांची उपस्थिती होती. व्यासपीठावर संस्थेच्या सचिव संगीताताई देशमुख, मंदाताई कुलकर्णी, कल्याणी मेढेकर, करुणा वैद्य आणि मुख्याध्यापिका उषा नाईक उपस्थित होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. अपर्णा अष्टपुत्रे आणि समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांनी पालकांशी संवाद साधला. पालकांनीही आपल्या पाल्याविषयीच्या शंकांचे आणि वर्तणुकीच्या समस्यांचे निराकरण करून घेतले.
पालकांसाठी...
विद्यार्थ्यांसाठी...
मुले शाळेत सहा ते सात तास असतात. उर्वरित वेळ ते पालकांसोबतच घालवतात. त्यामुळे मुलांच्या निकोप वाढीसाठी पालकांना प्रशिक्षणाची गरज असतेच. याबाबत दोन्ही तज्ज्ञांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. "सकाळ'ने हा उपक्रम आमच्या शाळेत राबविला, याबद्दल विशेष आभार.
- उषा नाईक, मुख्याध्यापिका, शिशुविहार शाळा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.