जिल्ह्यात बीड, माजलगाव व अंबाजोगाई येथे सत्र न्यायालय असून अन्य तालुक्यांच्या ठिकाणीही न्यायालये आहेत. यामध्ये एकूण १३ सत्र न्यायाधीश तर जेएमएफसी/सीजेएम व वरिष्ठ स्तर तसेच तालुका न्यायालयातील मिळून ३७, असे एकूण ५० न्यायाधीश आहेत. जिल्ह्यात फौजदारी स्वरूपाची व दिवाणी मिळून तब्बल ७६ हजार प्रकरणे न्यायासाठी प्रलंबित आहेत. फौजदारी स्वरूपाच्या प्रकरणांपेक्षा दिवाणी प्रकरणे जास्त प्रमाणात प्रलंबित आहेत. दिवाणी प्रकरणांमध्ये प्रकरणे प्रलंबित ठेवण्यासाठीच जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. दिवाणीमध्ये भूसंपादनाची प्रकरणे जास्त प्रलंबित असून यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन झाले तरी त्याला प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने व शासनाकडून मिळणाऱ्या निधीची कमतरता असल्याने शेतकऱ्यांना वर्षांनुवर्षे मावेजा मिळत नाही. न्याय विभागात पूर्वीच्या तुलनेत आता गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढले आहे. लोकअदालतीद्वारेही प्रकरणे निकाली काढली जात आहेत. सामान्यांमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी, यासाठी वकील संघ व विधिसेवा प्राधिकरणाकडून कायदेविषयक शिबिरे सातत्याने घेतली जात आहेत. बीड येथे जिल्हा सत्र न्यायालयाची अत्याधुनिक इमारत बांधण्यात आली असून यामध्ये सीसीटीव्ही यंत्रणेसह वातानुकूलित व्यवस्था आहे.
न्यायालयात येणाऱ्या न्यायाधीश, वकील ते फिर्यादी, साक्षीदारांची तपासणी केली जाते. न्यायालयाच्या नवीन इमारतीत शिस्त पाळली जाते. प्रलंबित प्रकरणांची संख्या जास्त असल्याने या प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी न्यायाधीशांसह वकिलांकडून पुढाकार घ्यायला हवा.
न्याय विभागाची सद्यःस्थिती
अपेक्षा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.