‘मी पुन्हा येईन...’ वाक्य खरे ठरले

Nanded News
Nanded News

नांदेड :  देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन...’ हे वाक्य खरे करून दाखविल्याची प्रतिक्रिया भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शनिवारी (ता.२३) ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.  


सत्तास्थापनेचा भाजपच्या कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव केला. त्याप्रसंगी श्री. चिखलीकर यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची सुत्रे स्वीकारल्याची बातमी सकाळीच कळाल्याने नांदेडमध्ये भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी जल्लोष करण्यास सुरुवात केली. कित्येक दिवसांपासून रंगलेल्या सत्तेसाठीच्या सारीपाटामध्ये भाजपनेच बाजी मारली. विशेष म्हणजे सत्ता स्थापन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना घेवून आले. 
 

शब्द खरे करून दाखवले

श्री. चिखलीकर म्हणाले की, गत पाच वर्षात फडणवीस यांनी राज्याला स्थिर सरकार देत मोठ्याप्रमाणावर विकास कामे केलेली आहेत. त्यामुळे जनतेनेही निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त मते दिली होती. मात्र, जनतेचा अनादर करून भाजपला वेगळे पाडण्याचा डाव सुरु होता. अखेर यात भाजपने बाजी मारली असून, मुख्यमंत्री म्हणून पुन्हा फडणवीस वीराजमान झाले आहे. त्यांनी ‘मी पुन्हा येईन...’ हे शब्द खरे करून दाखवले आहे.  राज्याला फडणवीस यांची गरजच होती. राष्ट्रवादीतर्फे अजित पवारांनी योग्य निर्णय घेतला.

स्थिर सरकार मिळेल

फडणवीस यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्याला पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. त्यामुळे निश्‍चितच महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल. मी भाजपचा खासदार या नात्याने मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे देखील श्री. चिखलीकर यांनी शेवटी अभिनंदन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com