'थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करणार'

'थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करणार'

नांदेड: एप्रिल 2018 पासून आजपर्यंत एकही वीजबील न भरलेल्या वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. कुठलेही कारण न ऐकता त्यांचा वीजपुरवठा खंडीत केला जाणार आहे.

नांदेड परिमंडळामध्ये (नांदेड, परभणी आणि हिंगोली) एक लाख 74 हजार 646 वीजग्राहकांकडे 63 कोटी 16 लाखाची थकबाकी असल्याचे मुख्य अभियंता संतोष वहाणे यांनी सांगितले. 

वीज ग्राहकांना योग्य व तात्काळ सेवा देण्यासाठी महावितरण कटीबध्द आहे. ज्या ग्राहकांची काही अडचण असल्यास त्यांनी महावितरणच्या टोल फ्री तक्रार क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. तक्रारीचे निराकरण करणे हे त्या-त्या स्तरावरील अधिकाऱ्यांचे कर्तव्य व जबाबदारी आहे.

नांदेड जिल्ह्यातील 48 हजार 217 वीजग्राहकांनी एप्रिल 2018 पासून आजतागायत एकही रुपया वीजबील भरलेले नसुन त्यांच्याकडे 16 कोटी 76 लाख रुपयाची थकबाकी आहे. तसेच परभणी जिल्ह्यातील 89 हजार 82 ग्राहकांकडे 37 कोटी 71 लाख रुपये थकबाकी असून हिंगोली जिल्ह्यातील 37 हजार 347 वीजग्राहकांकडे आठ कोटी 69 लाख रुपयाची थकबाकी आहे. अशा वीजग्रहाकांची वसुली मोहीम सुरू असून पैसे नाही भरल्यास त्यांचा पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.

अटल सौर कृषी पंप योजनेवर भर देण्यात येणार आहे. यात नांदेड परिमंडळातील मार्च 2018 पर्यंत वीज जोडणीसाठी पैसे भरून प्रलंबीत आहेत अशा कृषी ग्राहकांना प्रथम लाभ द्यायाचा आहे. एसी/ डीसी सौरपंप 95 टक्के अनुदानावर देण्याचे निश्चित झाले आहे. एससी, एसटीसाठी 22.5 टक्के राखीव ठेवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com