औरंगाबाद - राज्यात दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांचे अभिनंदन. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला होता. पण, शिवसेनेने गद्दारी केली होती. जनतेने दिलेल्या कौलाचा शिवसेनेने विश्वासघात केला, असा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला.
एका कार्यक्रमानिमित्त जावडेकर औरंगाबादेत आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधला. जावडेकर म्हणाले, राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक लढवली व जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला. जी काँग्रेस को सावरकरांना शिव्या द्यायची राम मंदिराला विरोध करायची देशात आणीबाणी लागू करणाऱ्या काँग्रेस सोबत जाण्याचे महापाप शिवसेनेने केले. हा सरळ-सरळ महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात आहे.
विश्वासघात शिवसेनेने केला हा जो घटनाक्रम झाला त्याबद्दल आश्चर्य वाटलं शिवसेना वर असे बोलू लागली की शिवसेना राष्ट्रवादी बरोबर गेली तर बरोबर आहे आणि राष्ट्रवादीचे काही आमदार देवेंद्र फडणवीस बरोबर आले तर चूक आहे. शिवसेनेने जनतेशी द्रोह केला. महायुतीच्या कौलाच्या विरुद्ध वागणूक केली. त्यामुळे आजच्या घटनेचे स्वागत करतो महाराष्ट्रभर याचा आनंद व्यक्त होत आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा - मागील २९ दिवसांत असे बदलत गेले महाराष्ट्राचे राजकारण
देशमुखाच्या गढीत काय चालंलय - लातूर महापालिकेत काँग्रेसमध्ये अस्वस्थता
काय होणार ? धनंजय मुंडे काका-सोबत की पुतण्यासोबत....
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.