पाऊस ब्रेकच घेईना 

वालसावंगी : परिसरात जलमय शेतात भिजून गेलेली मक्‍याची कणसे. 
वालसावंगी : परिसरात जलमय शेतात भिजून गेलेली मक्‍याची कणसे. 

वालसावंगी (जि.जालना) -  परिसरात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. 22) पावसाने हजेरी लावली. 
येथे गेल्या चार दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतशिवारांत विदारक चित्र बघायला मिळते आहे. गेल्यावर्षी कोरड्या अन्‌ यावेळी ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा पालापाचोळा केल्याने दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. 

परिसरात गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. 22) दुपारपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतात सोंगणी केलेल्या मका, सोयाबीन पिकाला मोठा फटका बसत आहे. अनेक शेतांत मकाची सोंगणी झाली आहे. कणीस खाली पडलेले आहेत. अशातच पाऊस सतत बरसत असल्याने सर्व कणसे पावसात भिजत आहेत. यामुळे मका डागी होण्याची शक्‍यता आहे, दर्जा देखील घसरणार असून कवडीमोल भावाने विक्री होण्याची शक्‍यता आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे, काही शेतकऱ्यांचा लागलेला खर्च देखील वसूल होणार नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. कपाशी, मिरची पिकांवरसुद्धा सततच्या पावसामुळे मोठा विपरीत परिणाम होत आहे.

दरम्यान, यंदा पावसामुळे शेतशिवारांत मोठे नुकसान होत आहे. या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com