पावसाने वळल्या कापसाच्या वाती 

अंबड : आलमगाव-हस्तपोखरी शेतशिवारात परतीच्या पावसाने कपाशीचे झालेले बेहाल.
अंबड : आलमगाव-हस्तपोखरी शेतशिवारात परतीच्या पावसाने कपाशीचे झालेले बेहाल.

अंबड (जि.जालना)- सततच्या पावसाने कापसाच्या जणू वाती वळल्या आहेत. ऐन उत्पन्नाच्या दिवसांत पिकांचे बेहाल झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अंबड तालुक्‍यातील आलमगाव, हस्तपोखरीसह अनेक ठिकाणी हे चित्र दिसत आहे. 

अंबड तालुक्‍यात सतत जोरदार पावसाने दिवसरात्र हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या उभ्या शेतात पिकांत पाण्याचे पाट साचले आहे. यामुळे खरिपाबरोबरच रब्बीला फटका बसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापसाच्या वाती झाल्या तर दुसरीकडे मका, सोयाबीन, बाजरी या पिकांना जागेवरच कोंब फुटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास अखेर निसर्गाने हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांनी केलेला खर्चही वसूल होत नसल्याचे विदारक चित्र आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. महसूल व कृषी विभागाच्या वतीने पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांढऱ्या सोन्याची पावसाने दुरवस्था केली. कापूस फुटताच वेचणीअगोदर वाती होत आहेत. हातात चार पैसे मिळण्याऐवजी खर्चही वसूल होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे आर्थिक समीकरण बिघडले आहे. 
- प्रकाश मुंजाळ 
शेतकरी, मार्डी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com