कार्यकर्त्यांची भावना जाणूनच सत्तारांबाबत निर्णय - रावसाहेब दानवे

raosaheb-danve
raosaheb-danve

औरंगाबाद - सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशावरून सिल्लोडसह जिल्ह्यात निष्ठावंतांची चलबिचल सुरू आहे. नाराज कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर सत्तार यांच्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे नवनियुक्‍त केंद्रीय ग्राहक राज्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी (ता.४) ‘सकाळ’ला सांगितले. 

केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर श्री. दानवे पहिल्यांदा औरंगाबादेत आले. कार्यकर्त्यांनी चिकलठाणा विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत केले. भाजप प्रवेशाबाबत आमदार अब्दुल सत्तार मुंबईत ठाण मांडून होते. 

मंगळवारी सायंकाळी चार वाजता सत्तार आणि दानवे पुन्हा एकदा विमानात सोबत प्रवास करीत औरंगाबादेत आले. यापूर्वीही दानवे-सत्तार हे खासगी विमानाने मुंबईला गेले होते. सत्तार यांच्या प्रवेशाबाबत दानवे म्हणाले, की सिल्लोडच्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर निर्णय घेणार आहे.

पुन्हा विमान प्रवास झाल्याविषयी विचारल्यानंतर श्री. दानवे म्हणाले, की सत्तार आणि माझी एक मिनीट भेट झाली. आता विखे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांचा मुहूर्त ठरल्यानंतर प्रवेश देऊ. मात्र, सत्तार यांच्याबाबत कोणताही मुहूर्त ठरला नसल्याचे त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com