भरती गैरव्यवहाराची सुई पश्‍चिम महाराष्ट्राकडे

Crime
Crime

हिंगोली - येथील राज्य राखीव दलातील भरती गैरव्यवहारात पश्‍चिम महाराष्ट्रातील एका मार्गदर्शन केंद्राकडे संशयाची सुई वळत असून, या मार्गदर्शन केंद्राची चौकशी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांनीही याला दुजोरा दिला असून, पश्‍चिम महाराष्ट्रात हे मार्गदर्शन केंद्र नेमके कोठे आहे याबाबत मात्र माहिती देणे टाळले जात आहे.

येथील राज्य राखीव दल भरती प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून, त्यानंतर सोमवारी (ता. 11) आणखी दोघांना अटक करण्यात आली. या दोघांकडून आणखी काही माहिती हाती लागते काय, याची शहानिशा पोलिसांकडून केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com