हिंगोली जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत निर्बंध वाढले; जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश

file photo
file photo

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ता. ३० एप्रिलपर्यंत निर्बध वाढविले असून दिलेल्या नियम अटीनुसार त्याचे पालन करावे लागणार आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाहीचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यात पाच ते ता. ३० एप्रिलपर्यंत कलम ४४ आणि रात्रीचा संचारबंदी लावण्यात आली आहे. या दरम्यान वैद्यकीय व इतर त्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार सायंकाळी आठ ते सकाळी सातवाजेपर्यंत आणि शुक्रवारी सायंकाळी आठ ते सोमवारी सकाळी सातपर्यंत सर्व उद्याने, मैदान बंद राहणार, दुकाने, बाजारपेठ आणि मॉल्समध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, मार्केट आणि मॉल्स पूर्ण दिवसभर बंद राहणार, अत्यावश्यक सेवा दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालू रखहणार, सरकारी कार्यालये ५० टक्के उपस्थितीसह कार्य करतील, वीज, पाणी, बँकींग व इतर वित्तीय सेवेशी निगडित इतर असलेली सर्व शासकीय कार्यालये तसेच आहे. शासकीय कंपन्या पूर्ण क्षमतेसह चालू राहणार, शासकीय कार्यालये, सरकारी कंपन्यामध्ये कोणत्याही अभ्यांगताना परवानगी दिली जाणार नाही त्यासाठी ई- मेल प्रसिद्ध करुन नागरिकांची कामे करावीत, खासगी वाहने, खासगी बससेवा सोमवार ते शुक्रवारी सकाळी सात ते रात्री आठ आणि ठिकाणी अत्यावश्यक सेवा कालावधीत सुरु राहतील.

रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल्समध्ये लॉजींगच्या आतील आवारात असलेले रेस्टॉरंट आणि बार चालू राहतील उर्वरित सर्व रेस्टॉरंट आणि बार बंद राहतील, सर्व धार्मिक, प्रार्थनास्थळ बंद राहणार, केशकर्तनालये दुकाने, ब्युटीपार्लस बंद राहणार, सर्व वृत्तपत्राची छपाई आणि सुरु राहणार, सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद राहतील, परंतु दहावी व बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सूट दिली आहे. कोणत्याही प्रकारचे धार्मिक ( यात्रा, जत्रा, नाही उरुस) सामाजिक, राजकीय आणि एप्रिलच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नाही.

लग्न समारंभास जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली. अंत्ययात्रेसाठी २० लोकांना परवानगी आहे. खाद्य पदार्थ फक्त पार्सल व घरपोच सेवा सुरु ठेवाव्यात, बांधकाम क्षेत्रात बांधकामाशी संबंधित कर्मचारी, मजूरांना त्याच ठिकाणी राहण्याची सोय आहे अशा बांधकाम व्यवसाय परवानगी असेल, अशा ठिकाणी साधन सामुग्री वाहतुकी व्यतिरिक्त कामगार व इतर वाहतुकीस परवानी असणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी  ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार, उल्लंघन करणाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com