ई-पेमेंट न झाल्यास बॅंक,कंपन्यांना शंभर रुपये दंड

file photo
file photo

औरंगाबाद : गेल्या काही वर्षांमध्ये बॅंकिग सेक्‍टरमध्ये अमुलाग्र बदल झाले. विशेष करून ऑनलाईन बॅंकिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. पंरतू ऑनलाईन व्यवहार करताना अनेकदा तांत्रिक अडचणीमुळे ई-पेमेंट होवू शकत नाही. अशावेळी ग्राहकांची गैरसोय होते. आता, ट्रान्झॅक्‍शन अयशस्वी झाल्यास व ते पैसे एका दिवसात परत न दिल्यास बॅंकेला भुर्दंड बसणार असून बॅंक दररोज शंभर रुपये देणार असल्याची नोटीस आरबीआयने शनिवारी (ता.21) जारी केली आहे. 


एका दिवसाच्या आता ग्राहकाला पैसे परत मिळाले नाही तर बॅंक आणि डिजिटल वॉलेटला दररोज 100 रुपये दंड भरावा लागणार आहे. हे नवे नियम युनिफाइड पेमेंट्‌स इंटरफेस (युपीआय), इमीडिएट पेमेंट सिस्टम (आयएमपीएस), नॅशनल ऑटोमेटेड क्‍लियरिंग हाऊस (एनएसीएच), ई-वॉलेट्‌स, कार्ड टू कार्ड पेमेंट यावर लागू होणार आहेत. यामुळे ग्राहकांचा आत्मविश्वास वाढेल आणि अयशस्वी व्यवहाराच्या प्रक्रियेत सुधारणा होईल, असे आरबीआयने नोटिशीत म्हटले आहे.

दरम्यान, डिजिटल व्यवहाराव्यतिरिक्त आरबीआयनेही नॉन डिजिटल व्यवहारासाठीही कालावधी निश्‍चित केली असून एटीएम आणि मायक्रो एटीएमसाठी 5 दिवसांची मुदत निश्‍चित केली आहे. यानंतर दररोज 100 रुपये दंड भरावा लागणार असल्याचे आरबीआयच्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com