काकडेंना राजकारणातून संन्यास घेण्याची वेळ येणार नाही: शिवसेना नेते

Arjun Khotkar
Arjun Khotkar

जालना : रावसाहेब दानवे आजपर्यत फक्त शिवसेनेमुळेच निवडून आलेत, आतापर्यंत दानवेंसाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या, ज्यांनी मदत केली त्या सर्वांनाच त्यांनी शत्रू बनवून घेतले. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, माझा विजय निश्चित आहे. त्यामुळे काकडेंना राजकारणातून संन्यास घेण्याची वेळ येणार नाही, असे शिवसेना नेते व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे.

राज्यात शिवसेनेशी युती झाली नाही, तर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे दीड ते दोन लाख मतांनी पराभूत होतील असे वक्तव्य भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेंनी केले होते. दरम्यान संजय काकडे यांनी  देशभरातील अभ्यासाअंतीच हे वक्तव्य केले आहे. आजपर्यंत काकडे यांचे सर्व अंदाज खरे ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या अंदाजापेक्षा जास्त मतांनी रावसाहेब दानवे जालन्यातून पराभूत होतील असा टोला खोतकर यांनी लगावला आहे. ते जालन्यात बोलत होते.

आतापर्यंत भाजप फक्त शिवसेनेच्या ताकदीमुळेच निवडून आला. मात्र दानवे ज्यांच्यामुळे निवडून आले त्या सगळ्यांनाच दानवेंनी स्वतःचे शत्रू बनवून घेतले आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत दानवे नक्की पराभूत होतील, त्यामुळे खासदार संजय काकडे यांना राजकारणातून संन्यास घेण्याची वेळ येणार नाही, असे देखील खोतकर यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com