दक्षिण मध्य रेल्वेला औरंगाबादचा तिटकारा

dkshin-madhya-railway-bharti-.png
dkshin-madhya-railway-bharti-.png

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराला दक्षिण मध्य रेल्वेने पुन्हा डावलले आहे. नांदेड विभागाने उन्हाळ्यासाठी तब्बल 146 रेल्वेगाड्या सुरु केल्या, मात्र त्यातील एकही रेल्वे औरंगाबाद, जालनावासीयांना मिळाली नाही. विशेष रेल्वेची मागणी असतानाही, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 

दक्षिण मध्य रेल्वेकडून मराठवाड्यावर सातत्याने अन्याय केला जात आहे. केवळ भाषिक वादाने मराठवाड्यावर सातत्याने अन्याय केला जात असल्याचा आरोप आहे. मुंबईला जाण्यासाठी केवळ देवगिरी एक्‍सप्रेस, नंदीग्राम एक्‍सप्रेस, तपोवन, जनशताब्दी एक्‍सप्रेस केवळ या चार गाड्या आहेत. या सर्व गाड्यांमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. मुंबईसाठी आणखी रेल्वे गाडी सुरु करावी अशी सातत्याने मागणी होत आहे. प्रचंड प्रवाशी असताना, नवीन गाडी सुरु केली जात नाही.

मुंबई मनमाड राजाराणी एक्‍सप्रेस औरंगाबादपर्यंत वाढवण्याचे अाश्‍वासन देण्यात आले. मात्र हा प्रस्तावही गुंडाळला आहे. श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथे फेब्रुवारी महिन्यात बारा वर्षातून एकादा होणारा महामस्ताभिषेक सोहळा झाला. त्यामुळे मराठवाड्यातील भाविकांसाठी विषेश रेल्वे सोडण्याची मागणी होती, मात्र शेवटपर्यंत झुलवत ठेवून ही गाडीही सुरु केली नाही.

आता उन्हाळ्याच्या सुट्यांच्या अनुषंगाने दक्षिण मध्ये रेल्वेने तब्बल 146 विशेष गाड्या सुरु केल्या, मात्र यातील एकही गाडी औरंगाबादसाठी दिलेली नाही. काही गाड्या परभणी, परळी, अकोला मार्गे वळवण्यात आल्या आहेत. काही रेल्वेला गर्दी लक्षात घेऊन आरक्षीत डबे वाढवण्यात आले, मात्र औरंगाबादहून जाणाऱ्या एकाही रेल्वेला एकही डबा वाढवण्यात आला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com