औरंगाबाद - मोठे संख्याबळ, अत्याधुनिक स्पीडगन असतानाही बीड बायपासवर बेफाम वाहतूक सुरूच आहे. परिणामी प्राणांतिक अपघातांत भर पडतच असून बळींवर बळी जात आहेत. वेगमर्यादेस चाप लावून अपघात रोखण्यातही फारसे यश पोलिसांना आले नसून प्रशासनाकडूनही ठोस उपाययोजना होत नाहीत.
एकीकडे शहरात वाहतुकीची समस्या वाढतच असताना बीड बायपासवर उपाययोजनांअभावी बळी जात आहेत. बेफाम वेगामुळे अनेक अपघात होऊन नाहक जीव जाण्याचे प्रमाणही चिंताजनक आहे. अनेक चालक 60 ते 80 किलोमीटर प्रतितास एवढ्या वेगाने वाहन चालवत असून, परिणामी अपघातांना निमंत्रण मिळत आहे. सद्यःस्थितीत रस्ता ओलांडण्यासाठी बायपासवर मोठी कसरत करावी लागते. गतीबाजांना चाप लावण्यासाठी "स्पीडगन'चा पोलिस दलाकडून वापर करण्यात येतो. परंतु शहरात बीड, जळगाव बायपास, जालना, हर्सूल आणि वाळूज असे पाच वर्दळीचे रस्ते आहेत; पोलिस दलाकडे केवळ तीनच स्पीडगन आहेत. त्यांचाही पूर्णपणे वापर होत नाही. त्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण नाही. काही मोजक्या वाहनांवरच कारवाई होत असून, गतिमर्यादा ओलांडणारी बहुतांश वाहने पोलिसांसमोरून भुर्रकन जातानाचे चित्र असून त्यांच्यावरही कारवाई होताना दिसत नाही.
बायपासवर रात्रीही अपघात
रात्रीच्या वेळी बीड बायपासवर बेफाम वाहतूक होते. शंभर व त्यापेक्षा जास्त वेगाने खासगी बस, ट्रक, कार आदी वाहने पळवली जातात. बहुतांश अपघात या वेळातच घडतात; मात्र रात्रीच्या अंधारात संधीचा फायदा घेत वाहनचालक वाहनांसह पसार होतात. अशा वाहनांवर रात्री स्पीडगन व पोलिसांचाही वचक नाही.
बायपासवर वाहनांचा सरासरी वेग
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.