स्टेट बॅंकेचे चेक क्‍लिअरन्स मंदावले   

स्टेट बॅंकेचे चेक क्‍लिअरन्स मंदावले   

औरंगाबाद : स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) चेक क्‍लिअरन्स प्रक्रियेत बदल केला आहे. मेट्रो सिटीच्या माध्यमातून नागरिकांचा वेळ वाचविण्यासाठी आणि व्यवहारात गती आणण्यासाठी हा बदल केला आहे; मात्र या बदलाचा शहर व जिल्ह्यात उलट परिणाम दिसून येत आहे. कमी संख्याबळ असल्याने चेक क्‍लिअरन्स प्रक्रिया मंदावली आहे. 

शहरात एसबीआयच्या 54 शाखा आहेत. या शाखेत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. सहा बॅंकांचे विलनीकरण झाल्यानंतर एसबीआयची ग्राहक संख्या तिप्पट झाली आहे. प्रत्येक शाखेत एक लाखाहून अधिक ग्राहक आहे. या ग्राहकांना सेवा देण्यासाठी पुरेसे कर्मचारी नसल्याने अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर सेवा देण्यात येत आहे. पूर्वी चेक क्‍लिअरन्सची व्यवस्था ही झोनल कार्यालयातून होत असे. गेल्या पंधरा दिवसांपासून केलेल्या बदलामुळे आता चेक क्‍लिअरन्ससाठी तो ज्या-त्या शाखेत पाठविला जात आहे. नियमित कामे आणि त्यात चेकची कामे वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांवर पुन्हा नवी जबाबदारी येऊन पडली आहे. हीच परिस्थिती ग्रामीण भागात असल्यामुळे तेथेही कर्मचाऱ्यांवर अधिकचा ताण येत सेवा-सुविधांवर परिणाम होत आहे. मुंबई, नागपूर अशी मेट्रो शहरे डोळ्यांसमोर ठेवून एसबीआयने चेक क्‍लिअरन्सचा निर्णय घेतला होता. यामुळे चेक क्‍लिअरन्स होत नसून अनेकांची कामे खोळंबली असल्याच्या तक्रारी बॅंकेकडे येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com