बारावीचा निकाल पाहून विद्यार्थिनीची आत्महत्या 

बारावीचा निकाल पाहून विद्यार्थिनीची आत्महत्या 

औरंगाबाद - बारावीचा निकाल लागल्यानंतर खोली बंद करून एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मुकुंदवाडी परिसरात मंगळवारी (ता. 28) दुपारी दोनच्या सुमारास घडली. 

किरण गुलाब चव्हाण (वय 19, रा. मुकुंदवाडी परिसर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. दुपारी एक वाजता निकाल हाती येताच किती गुण मिळाले? याबाबत किरणने कोणालाही काहीच सांगितले नाही. पालकांनीही तिला त्याबाबत विचारले नाही. त्या वेळी आई-वडील एका खोलीत जेवण करीत असताना किरण दुसऱ्या खोलीत गेली. तिने आतून दार लावून घेत गळफास घेतला. जेवण झाल्यानंतरही बराचवेळ किरण बाहेर न आल्याने वडिलांनी तिला आवाज दिला; पण आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजा वाजविला. शंका आल्यानंतर पत्रा उचकटून आत डोकावले. तेव्हा किरण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर दरवाजा तोडून नातेवाईक घरात गेले. त्यांनी किरणला तत्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथील डॉक्‍टरांनी तिला पावणेतीन वाजता मृत घोषित केले. त्यानंतर ही माहिती मुकुंदवाडी पोलिसांना मिळाली. सहायक निरीक्षक वनिता चौधरी यांनी मृतदेह घाटीत नेला. उशीर झाल्यामुळे शवविच्छेदन करण्यात आले नाही; तसेच नातेवाईक दु-खात असल्याने नेमके कारण काय, हेही समजले नाही. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com