दुष्काळातही फुलवला ऊसाचा मळा

दुष्काळातही फुलवला ऊसाचा मळा

सोयगाव : दुष्काळात आधार मिळावा यासाठी शेततळ्यावर ऊसाचा मळा फुलवून पिंपरी (अंतुर) च्या शेतकऱ्याने सोयगाव तालुक्यात एकमेव उस उत्पादक शेतकरी म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान या उसाची पुढील महिन्यात कापणीवर आला असल्याचे प्रयोगशील शेतकऱ्याने सांगितले.

खरिपाच्या पिकांना फाटा देत आणि केळी बागांना लागणारे जास्तीचे पाणी उपलब्ध नसल्याने अंतुर(पिंपरी)शिवारातील लालबागेत शेतकरी रवींद्र भिला पवार यांनी नोव्हेंबर 2017 मध्ये ऊस लागवडीचा प्रयोग केला अन दुष्काळात हाच प्रयोग या शेतकऱ्याचा आधार बनला आहे. आगामी महिन्यात या ऊसाची कापणी करण्यात येणार असल्याने 2500 रु भावाने चाळीसगाव चं बेलगंगा कारखान्याला या उसाची वाहतूक करण्यात येणार आहे. दरम्यान पंचवीसशे रु भावाने उसाची विक्री करूनही कारखान्याकडून या शेतकऱ्याला जास्तीचा चारशे रु प्रती टन परतावाही मिळणार असल्याने उसाच्या लागवडीने शेतकऱ्याची दिवाळी गोड झाली आहे.

फळबागा आणि खरिपाच्या पिकांसह इतर पिके घेण्यासाठी लागणारी मजुरांची टीम यातून सुटका करण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने केली ऐवजी यंदाच्या हंगामात पिंपरी अंतुर भागात पाच एकर क्षेत्रावर उसाची लागवड केली आहे. कमी पाण्यावर जास्तीचे उत्पन्न या प्रयोगातून शेतकऱ्याने लालबाग शिवारात ऊस लागवड केली. तीसुद्धा ठिबक सिंचन वर थेंब थेंब पाण्यावर शेततळ्याच्या पाण्याचा आधार घेत या शेतकऱ्याने उसाची वाढ केली. ठिबक सिंचन वर उसाची लागवड हा पिंपरी अंतुर पॅटर्न राज्यात मॉडेल प्रयोग ठरला आहे. दरम्यान उस लागवडीआधी या शेतकऱ्याने शेतात मागेल त्याला शेततळे या योजनेतून शेततळ्याची उभारणी केली होती. या शेततळ्याच्या अथांग जलसागरावर शेतकऱ्याने उसाची बाग फुलाविल्याने बनोटी मंडळातील पिंपरी अंतुर शिवारातील हा एकमेव तालुक्यातील उस उत्पादक शेतकरी ठरला आहे.

चाळीसगाव कारखाना ऊस घेण्यास तयार
या शेतकऱ्याच्या उसाची खरेदी जळगाव जिल्हातील चाळीसगाव येथील बेलगंगा कारखाना हा पिंपरी अंतुर शिवाराच्या सीमारेषेवर लागुनच असल्याने या शेतकऱ्याला कमी वाहतूक खर्चात उस कारखान्यावर पोहच करणे शक्य होत असल्याने यशस्वी उस उत्पादक शेतकऱ्याला कमी खर्चात कारखान्यावर उस पोहचविणे शक्य झाले आहे.

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटणार
ऐन दुष्काळात शेततळ्याच्या पाण्यावर उसाची लागवड करून या शेतकऱ्याने विहिरींच्या खालावलेल्या पाणी पातळीचा विचार न करता जलयुक्त शिवार योजनेतून तयार केलेल्या सिमेंटबांध मध्ये पाणी साठवून ठेवलेल्या पाण्याचा शेततळ्यात पाणी सोडून शेततळ्याचे शोगोशोग पाणी कायम ठेवत उसाची वाढ केली.ठिबक सिंचनावरील लागवड केलेल्या या उसाची आगामी महिन्यात कापणी होणार आहे. दरम्यान भर उन्हाच्या तीव्रतेतही शेततळ्यात अथांग जलसागर दिसत असल्याने जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न या उस लागवडीतून मार्गी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com