पावसाने पीक हातातून गेल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

File photo
File photo

येडशी (ता. उस्मानाबाद) : पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने आळणी (ता. उस्मानाबाद) येथील एका तरुण शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी (ता. 17) सकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

 
सचिन विजयसिंह वीर (वय 26, रा. आळणी, ता. उस्मानाबाद) असे मृताचे नाव आहे. परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्याकडे सामायिक सहा एकर शेती असून, आजोबा विठ्ठल भगवान वीर यांच्या नावावर सेवा संस्थेचे कर्ज व अन्य देणी आहेत. त्यातच परतीच्या पावसाने पिकांच्या झालेल्या नुकसानीने आलेल्या नैराश्‍यातून सचिन वीर यांनी शेजारील मारुती गेणा वीर यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही माहिती मिळताच उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक बी. बी. नाईकनवरे, हेडकॉन्स्टेबल विजयानंद साखरे यांनी घटनास्थळ गाठले. याप्रकरणी येडशी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com