अडचणीच्या काळात धनंजय मुंडेंना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

Dhananjay Munde
Dhananjay Munde

नवी दिल्ली : परळीत बहिण पंकजाविरुद्ध निवडणूक आणि नुकतीच व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमुळे अडचणीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. 

बेलखंडी मठ जमीन गैरव्यवहार म्हणजेच जगमित्र साखर कारखाना गैरव्यवहार प्रकरणी मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देत आता या प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मुंडेंना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. 

धनंजय मुंडे यांच्याविरोधात नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. औरंगाबाद खंडपीठाच्या या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाने  राज्य सरकारला नोटीस बजावून याप्रकरणी उत्तर मागितले होते व या प्रकरणाची सुनावणी आज (सोमवार) ऐन मतदानाच्या दिवशी ठेवली होती. आज झालेल्या सुनावणीनंतर आता पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे. 

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातील पूस या गावात जगमित्र सहकारी साखर कारखाना प्रस्तावित होता. हा साखर कारखाना सुरु करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी 2006 ते 2010 या कालावधीत शेकडो एकर जमीन विकत घेतली त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून तब्बल 25 कोटी रुपयांचं भागभांडवलही उभं केलं. मात्र कारखाना काही सुरु झाला नाही. या प्रक्रियेत धनंजय मुंडे यांनी पूस या गावात असलेल्या बेलखंडी मठाची 25 एकर जमीनही विकत घेतली. ही जमीन बेलखंडी मठाला इनाम दिलेली. जमीन होती आणि त्याचा विक्री व्यवहार होऊ शकत नव्हता याची माहिती असतानाही बेकायदेशीर पद्धतीने ही जमीन विकत घेण्यात आली आणि धनंजय मुंडे अडचणीत आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com