शहरात साडेतीनशे शाळाबाह्य मुले !

शहरात साडेतीनशे शाळाबाह्य मुले !

औरंगाबाद - शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी होऊन तब्बल 10 वर्षे उलटली असली तरी अद्याप शाळाबाह्य मुलांचे प्रमाण कमी झालेले नाही. शहरात आजही 350 शाळाबाह्य मुले असून, त्यांच्यासाठी महापालिकेच्या जवळच्या शाळांमध्ये शिक्षणाची सोय केली आहे. 

शासनाने 2009 मध्ये शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी केली आहे. त्यानुसार प्रत्येक बालकाला शिक्षण मिळणे अपेक्षित आहे. असे असले तरी हातावर पोट असलेल्या माता-पित्यांच्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुलांचा प्रश्‍न अद्यापही कायम आहे. महापालिकेने शहरात नुकतीच शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण केले. त्यानुसार शहरात 350 शाळाबाह्य मुले आढळून आली. ही मुले मुकूंदवाडी आणि जबिंदा लॉन परिसरात पाल टाकून राहणाऱ्या कुटुंबातील आहेत. या मुलांना जवळच्या शाळांचे शिक्षक तिथे जाऊन शिकवीत आहेत, ज्यांना शक्‍य असेल ते शाळेत येतात असे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले. 

महापालिकेचा 'भाऊ-दीदी' उपक्रम 
तत्कालीन महापालिका आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी शाळाबाह्य मुलांची शहरात शोध मोहीम घेतली होती. त्यासाठी "भाऊ-दीदी' प्रकल्प राबविण्यात आला होता. प्रत्येक मुलासाठी एक भाऊ व बहिणीची निवड करून शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. त्यात सुमारे साडेतीन हजार शाळाबाह्य मुले आढळून आली होती. पुढे राज्य शासनाने पथदर्शी प्रकल्प म्हणून महापालिकेच्या प्रकल्पाची निवड केली. 

शाळाबाह्य म्हणजे काय? 
स्थलांतर, अंधश्रद्ध, शैक्षणिक उदासीनता यामुळे शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेलेली सहा ते 14 वयोगटातील मुले किंवा 6 ते 18 गटातील अपंग मुले यांना शाळाबाह्य मुले समजले जाते. महिन्यात पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची गणना देखील शासनाने शाळाबाह्य मुलांमध्ये केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com