या ६० बालकांचा शोध लागेना

file photo
file photo

नांदेडः लहान मुले ही निरागस असतात. बालकांना कधी कुणाची गोष्ट काळजाला भिडेल हे सांगता येत नाही. पालकाने घरातील लहान मुलावर सहज राग व्यक्त केला तरी, हा राग मनात धरून लहान मुले थेट घरातुन निघुन जाण्याचे धाडस करतात आणि अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. नांदेड जिल्ह्यातदेखील गेल्या वर्षभरात पाच- दहा नाही तर चक्क ७३ मुले हरवल्याती तक्रार आहे. यातील केवळ १३ मुले सापडली आहेत. तर ६० मुले अजून देखिल सापडली नाहीत. हे नांदेड चाईल्ड लाईनच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसून येते.
 
जिल्ह्यातील हरवलेली मुले नेमकी गेली कुठे, त्यांचा अद्याप शोध का लागत नाही, अशी पालकांची भावना असून, अनेक पालक मुलांच्या या विचित्र वागण्यामुळे चांगलेच धास्तावले आहेत. यामुळे मुलांना काही बोलायचे देखिल नाही. अशी पालकांना भूमिका घ्यावी लागत आहे. अगदी काही वर्षापूर्वी मेट्रो शहरातील मुले पळुन गेल्याच्या घटना वर्तमानपत्रातुन वाचण्यात एकण्यात येत होत्या. परंतु, काही वर्षापासून नांदेड शहरात देखिल अशा घटना मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे पुढे येत आहे.
 
चाईल्ड लाईन संस्थेने प्रसिद्ध केकेल्या आकडेवारीवरून दर महिण्याला पाच ते दहा मुले हरवल्याची नोंद होत आहे. हरवलेल्या मुलांच्या नोंदीचे अकडे चाईल्ड लाईन शिवाय पोलिस ठाण्यातुन प्राप्त झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ही संख्या वाढत आहे.

वर्षभरात केवळ १३ मुले शोधण्यात यश


एकुण हरवलेल्या मुलांची संख्या ६० इतकी असून, पोलिस आणि चाईल्ड लाईनच्या माध्यमातुन वर्षभरात केवळ १३ मुले शोधण्यात यश आले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

आकडेवारीत यामुळे असू शकतो बदल


चाईल्ड लाईन हेल्प लाईनच्या प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत बदल झालेला असू शकतो. कारण अनेक मुले जेव्हा घरातुन पळुन जातात तेव्हा त्यांची नोंद होते. परंतु, ती मुले जेव्हा घरी परत येतात तेंव्हा अनेक पालक मुलगा मिळाल्याची माहिती देत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हरवलेल्या ६० बालकांपैकी नेमकी किती बालक सापडले आणि किती नाही, या अकडेवारीत संदिग्धता दिसून येते.

ही आहेत निघुन जाण्याची कारणे

हल्ली मुले शाळेतुन आल्याबरोबर त्यांना खासगी शिकवणी वर्गाला जावे लागते. तिथुन आल्याबरोबर शाळा आणि शिकवणी वर्गात दिलेला होमवर्क पूर्ण करावा लागतो. परीक्षेत मार्क कमी मिळाल्यास व अभ्यास न केल्यास आई-वडील आणि कधीकधी शिक्षक रागावतात. यातच मारही खावा लागतो. टीव्ही, मोबाईलपासून दूर ठेवले जाते. त्यामुळे मुलांची चिडचिड वाढते आणि मुले घरातुन निघुन जातात.    
 

वर्षभरात ७३ मुले हरवल्याती तक्रार


विविध कारणाने मुले घरातुन पळुन जातात अशा मुलांची माहिती रेल्वे आणि बस्थानकातुन प्राप्त होते. तर काही मुले हरवल्याची माहिती पोलीस ठाण्यातुन देखिल मिळते. मागील वर्षभरात ७३ मुले हरवल्याती तक्रार आहे. यातील केवळ १३ मुले सापडली आहेत. तर ६० मुले अजून देखिल सापडली नाहीत.
डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com