बीड : बंधाऱ्या नजीक सेल्फी काढण्याच्या नादात तोल जाऊन तीन जण नदीत पडले. खोल पाण्यात बुडून तिघांचाही मृत्यू झाल्याची घटना वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे शनिवारी (ता. दोन) घडली. ्रगामस्थाांनी मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.ताहा शेख (वय २०, रा. ढाकरगाव, ता. अंबड जि. जालना), सिद्दीकी शेख (वय २२, रा. ढाकरगाव, ता. अंबड, जि. जालना) व शहाब (पूर्ण नाव समजले नाही, वय २५, रा. बिहार, ह. मु. ढाकरगाव, ता. अंबड, जि. जालना) अशी घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे एका खाजगी उर्दु शाळेतील शिक्षकाच्या मुलीचा चार महिन्यापूर्वी विवाह झाला. विवाहानंतर मुलगी, जावई आणि जावयाचा मित्र कवडगाव या सासरवाडीमध्ये आले होते. दुपारचे जेवण झाल्यानंतर चारच्या सुमारास ते फिरण्यासाठी बाहेर पडले. समोर असलेल्या नदीच्या पाण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. मुलगी, जावई, जावयाचा मित्र आणि नात्यातील दोन लहान मुले हे नदीच्या पात्रात सेल्फी काढत असताना तोल गेला. नदीमध्ये वाळू उपशामुळे निर्माण झालेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. यात तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने नातेवाईकांची दोन मुले सुखरूप वाचली आहेत. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेत शोध मोहिम राबवली. तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यामध्ये ग्रामस्थांना यश मिळाले. यात मयत तिघांचा मृतदेह वडवणीच्या प्राथमिक रूग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणला आहे. उशिरापर्यंत वडवणी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.