नांदेड : पोलिस महासंचालक कार्यालयाच्या आस्थापना विभागात राज्यातील जवळपास पाचशे फौजदारांच्या सात महिण्यांपासून विनंती बदल्या काढण्यास मुहूर्त लागत नसल्याने फौजदारांमधून नाराजीचे वातावरण पसरले आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून यासंर्दभात बदली विनंती अर्ज मागविण्यात येऊन त्याचे नियोजित वेळापत्रकही जाहीर करण्यात आले होते.
वेळापत्रकांनुसार 15 एप्रिलपर्यंत विनंती बदल्यांचे आदेश निघतील असे जाहीर करण्यात आले होते. सर्वसाधारण बदल्या (जीटी) चे आदेश मे महिन्याचे शेवटच्या आठवड्यात निर्गमित झाले. परंतु, परिक्षेत्रात किंवा आयुक्तालयात विहित कालावधी पुर्ण न केलेल्या अधिकाऱ्यांसाठी विनंती बदल्यांचे अर्ज त्यांना इच्छुक ठिकाणी बदली का पाहिजे याचे सबळ कारण अर्जामध्ये नमुद करुन योग्य रितसर मार्गाने डीजी कार्यालयामध्ये मागविण्यात आले होते. मात्र अर्ज मागवुन सात महिने लोटले तरी विनंती बदल्यांचे आदेश रखडले आहेत.
विनंती बदलीची कारणे
आयुक्तालयात, परिक्षेत्रात सेवा बजाविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विनंती बदली मागण्याचे वेगवेगळी कारणे आहेत. 300 ते 400 किलोमिटरचे अंतर असल्याने व कुटुंब लांब अंतरावर राहत असल्याने बदली जवळच्या ठिकाणी घेण्याकरिता विनंती अर्ज करण्यात येतात. तसेच काहींचे मुलांचे शिक्षण, वृध्द आईवडिलांचे उपचार एका ठिकाणी चालु असते व ड्युटीचे ठिकाण लांबवर असल्याने कर्तव्यावर लक्ष ठेवता येत नाही.
अतिरिक्त पोलिस महासंचालक संदीप बिष्णोई
नांदेड दौऱ्यावर संदीप बिष्णोई आले असता त्यांच्याशी या प्रकरणी विचारले असता ते म्हणाले की, हा विषय पोलिस महासंचालक कार्यालयाचा आहे. मी फक्त त्या समितीवर सदस्य असल्याने माझा काहीच अधिकार पोहचत नाही. मात्र 2018 पासून बदलीचे अधिकारप्राप्त असलेले आस्थापना शाखेचे प्रमुख अप्पर पोलिस महासंचालक संदीप बिष्णोई यांनी बदलीबाबत न बोलण्याचे टाळले याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.