कोरोनाच्या भीतीने गावाकडे आलेल्या चोरट्यांना अटक

Shirur Anantpal News
Shirur Anantpal News

शिरूर अनंतपाळ  (जि.लातूर) : शहरात पंधरा दिवसांपूर्वी भरदिवसा घरफोडून सोन्याचे दागिने लंपास केलेले अज्ञात चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या हाती मुद्देमालासह शनिवारी (ता.२८) हाती लागले. त्यांना निलंगा येथील न्यायालयाने एक एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी हे कोरोना संसर्गामुळे गावी परत आल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडे त्यांची माहिती मिळाली आणि आरोपीना ताब्यात घेण्यात आल्याचे कळते.


शिरूर अनंतपाळ शहरात ता.१४ मार्च रोजी भरदिवसा नितेश हिंगमीरे हे कुटुंबियांसह कामानिमित्त घराबाहेर पडल्याचे पाहून अज्ञात चोरटे घराचे कडीकोंडा मोडून कपाटात ठेवलेले पाच तोळ्याचे दागिने लंपास केले होते. या संदर्भात फिर्याद हिंगमिरे यांनी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून अज्ञात चोरट्याविरूदध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे अज्ञात चोरटे स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांच्या हाती नुकतेच लागले. या चोरट्यांनी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केल्यानंतर त्यांना निलंगा न्यायालयात उभे केले असता आरोपी राजकुमार माचबे ( वय २४, रा.दारफळ ता.जि.उस्मानाबाद) व आकाश बुधवाडे (वय २५, रा.बाभळगाव) या दोघांना एक एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. वरील आरोपी हे कोरोना संसर्गामुळे गावी परत आल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडे त्यांची माहिती मिळाली आणि आरोपीना ताब्यात घेण्यात आल्याचे कळते. याबाबतची महिती स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याकडे दुरध्वनीवर केली असता संपर्क होऊ शकला नाही.


लातुरात मिळणार दुपारी दोनपर्यंतच भाजी अन् फळे, गर्दी टाळण्यासाठी निर्णय
लातूर ः देशभरात टाळेबंदी (लॉकडाऊन) आहे. राज्यात संचारबंदीही सुरु आहे. पण लोकांच्या सोयीसाठी यातून भाजीपाला, फळे विक्रीसाठी सूट देण्यात आली आहे. पण गेल्या काही दिवसांपासूनचा अनुभव पाहिला तर याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. यातून सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंगचा) प्रश्नही निर्माण होत आहे. पोलिसांनी सांगूनही ही गर्दी काही हटायला तयार नाही. हे लक्षात आल्यानंतर आता जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी दुपारी दोन वाजेपर्यंतच शहरात भाजीपाला व फळे विक्रीला परवानगी दिली असून तसे आदेशही काढले आहेत.
प्रत्येकासाठी भाजीपाला आवश्यक आहे. शहरात राजीव गांधी चौक, दयानंद महाविद्यालय, गंजगोलाई, अंबाजोगाई रस्ता अशा अनेक ठिकाणी रस्त्यावरच भाजीपाला विक्री केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याच पद्धतीने शहरात भाजीपाल्याची विक्री केली जात आहे. पण सध्या कोरोना विषाणुचा संसर्ग वाढत चालला आहे.

रस्त्यावरची गर्दी कमी करण्यासाठी महापालिकेने या भाजी विक्रेत्यांना ठराविक जागा चार पाच फूट अंतर ठेवून आखून दिली आहे. यात दयानंद महाविद्यालयाच्या परिसरातील भाजी विक्रेत्यांना ईदगाह मैदानावर जागा देण्यात आली आहे. तर राजीव गांधी चौकातील भाजी विक्रेत्यांना बिडवे लॉन्समध्ये जागा देण्यात आली आहे. सध्या टाळेबंदी आहे. त्यामुळे गंजगोलाईतील व्यापारी संकूल बंद आहे. त्यामुळे गंजगोलाईतील रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना एका एका गाळ्यासमोर बसवण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने बसण्याची व्यवस्था करून देण्यात आली असली तरी या ठिकाणची गर्दी कमी होताना दिसत नाही. पाव किलो, अर्धा किलो भाजीसाठी देखील नागरिक घराबाहेर पडत आहेत. काही जण तर विरंगुळा म्हणून बाहेर पडत आहेत. त्यात पोलिसांनी हात आखडता घेतल्याने नागरिकांची रस्त्यावरची गर्दी वाढत चालली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही असेच चित्र पाहायला मिळत आहे.

दिवसभर भाजी विक्रीच्या ठिकाणची गर्दी राहत आहे. हे लक्षात आल्यानंतर नागरिकांची एका ठिकाणची गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी जिल्ह्यातील सर्व भाजीपाला व फळांच्या विक्रीची वेळ निर्धारित केली आहे. शहरासोबतच आता जिल्ह्यात दुपारी दोन वाजेपर्यंतचे भाजीपाला व फळांची विक्री करता येणार आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ तसेच भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येऊन कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com