आझाद मैदानावर अंतर ठेवत भरला भाजी बाजार

जालना शहरातील आझाद मैदान येथे नगरपालिकेच्या आदेशानंतर विशिष्ट अंतर ठेवून भरलेले भाजीपाला बाजार.  
जालना शहरातील आझाद मैदान येथे नगरपालिकेच्या आदेशानंतर विशिष्ट अंतर ठेवून भरलेले भाजीपाला बाजार.  

जालना - शहरातील आझाद मैदान येथे नगरपालिकेच्या आदेशानंतर विशिष्ट अंतर ठेवून भाजीपाला मार्केट भरविण्यात आले आहे. तसेच नूतन वसाहत येथे ही भाजीपाला मार्केटमध्ये विशिष्ट अंतर ठेवण्यात येत आहे.  भाजी खरेदी करणारांची संख्याही तूरळकच होती.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला मार्केट वगळता  देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र, शहरात भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची भाजीपाला मार्केटमध्ये मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे नगरपालिकेकडून नूतन वसाहत येथे विशिष्ट अंतरावर मार्किंग करून भाजीपाला मंडई सुरू ठेवली आहे.

तसेच फुलेमार्केट परिसरातील भाजीपाला मार्केटमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. त्यामुळे नगरपालिकेने शहरातील आझाद मैदान येथे मार्किंग करून भाजीपाला मार्केट भरविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून आझाद मैदान येथे भाजीपाला मार्केट भरत आहे.

 फुले मार्केटमध्ये गर्दी

शहरातील फुले मार्केट परिसरातील भाजीपाला मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी आझाद मैदान येथे नगरपालिकेने भाजीपाला मार्केट सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, फुले मार्केट परिसरातील भाजीपाला मार्केट येथील नागरिकांची गर्दी कमी होण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. 

चढ्या दराने विक्री केल्यास कारवाई

भाजीपाला, कांदे , बटाटे चढ्या दराने विक्री करत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी स्पष्ट केले आहे. घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांनी  आपले जीवनावश्यक वस्तू व किराणाचे दुकान उघडे ठेवावेत व गरजू ग्राहकांना जीवनावश्यक वस्तू योग्य दराने पुरवठा करण्यात यावा. कोणीही जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला व कांदे, बटाटे चढ्या दराने विक्री करू नये. अन्यथा व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. 

साठेबाजीसह काळाबाजार केल्यास फौजदारी गुन्हे

जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या संबंधित व्यापारी,दुकानदार , व्यक्ती व संस्था यांच्याविरुद्ध  फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.  तहसीलदारांनी आपल्या तालुक्यातील जीवनावश्यक वस्तूंचे घाऊक व किरकोळ दुकाने चालू आहेत काय याची खात्री करावी तसेच कोणतीही जीवनावश्यक वस्तू अथवा भाजीपाला, कांदे, बटाटा यांची चढ्या दराने विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com