आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन; २३५ जणांवर कारवाई

file photo
file photo

परभणी : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. परंतु, नागरिकांकडून या कायद्याचे उल्लघन केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून २३५ नागरिकांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात आली आहे.

कोरोना विषाणू साथरोगासंदर्भातने जिल्ह्यामध्ये उद्‍भलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी परभणी जिल्हा पोलिस दलाकडून सर्व नागरिकांना घरातच राहण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. परंतु, पोलिस, जिल्हा प्रशासनाच्या जनजागृतीनंतरही अनेक लोक विनाकारण रस्त्याने फिरतांना दिसत आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्याच्या सीमेवर आठ ठिकाणी नाकाबंदी पॉईंट सुरू असून कोणत्याही वाहनांना जिल्हा हद्दीत व जिल्हा हद्दीच्या बाहेर परवानगीशिवाय प्रवेश दिला जात नाही. राज्यातील व परराज्यातील स्थलांतरीत लोकांना व त्यांच्या वाहनांना ताब्यात घेऊन रिलीफ कॅम्पमध्ये त्यांची सोय करण्यात येत आहे. जिल्ह्यातील खरेदी - विक्रीची ठिकाणे भाजी मंडई, किराणा दुकान या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जिल्हा हद्दीत सतत सतर्क गस्त सुरू आहे. 


७२ ठिकाणी लाकडी बॅरिकेट्स लावून रस्ते बंद
कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून जमाव बंदी आदेश लागू आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ११ आरोपींविरुद्ध सहा गुन्हे दाखल केले आहेत. तसेच अद्यापपर्यंत जिल्ह्यात एकूण ९२ गुन्हे दाखल आहेत. २३५ आरोपींवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यता आली आहे. विनाकारण फिरणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाई करून आतापर्यंत ४३८ वाहने जप्त करण्यात आली आहेत. गल्लीबोळांतून येणाऱ्या दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने थांबविण्यात यावे यासाठी शहरातील ७२ ठिकाणी लाकडी बॅरिकेट्स लावून रस्ते बंद केले आहेत. जिल्ह्यामध्ये सात ठिकाणी रिलीफ कॅम्प सुरू असून त्यामध्ये परप्रांतीय व राज्यातील स्थलांतरीत कामगार व गरजूंना ठेवण्यात आले आहे. त्यात २१४ पुरुष, ८० महिला, तर ७२ मुले आहेत.


आत्तापर्यंतच्या कारवाईचा लेखाजोखा
- २३५ जणांवर आपत्ती व्यवस्थान कायद्यांतर्गत कारवाई
- विनाकारण फिरणारे ४३८ वाहने जप्त
- शहरातील ७२ ठिकाणी लाकडी बॅरिकेट्स लावले
- ७ रिलीफ कॅम्पमधून ३६६ स्थलातरितांना आसरा
- पोलिसांकडूनही गरजूंना जेवणाचे मोफत वाटप
- पोलिसांकडून दिलेल्या पासचादेखील होतोय गैरवापर

विनाकारण घरा बाहेर पडू नका
सध्या जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. त्याच बरोबर संचारबंदीदेखील आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी घराच्या बाहेर पडू नये. विनाकारण घराच्या बाहेर पडल्यास कडक कारवाई केली जाईल.
- कृष्णकांत उपाध्याय, पोलिस अधीक्षक, परभणी
.....
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com