औरंगाबाद - भूजल व भूपृष्ठावरील पाणीसाठे झपाट्याने आटत चाललेल्या मराठवाड्याची वाटचाल मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात टॅंकरवाड्याच्या दिशेने सुरू झाली आहे. आठही जिल्ह्यांतील 1240 गावे 397 वाड्यांना भीषण जलसंकटाचा सामना करावा लागत असून, या गाव-वाड्यांमधील 33 लाख 22 हजारांवर लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. या गाव-वाड्यांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने 1627 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.
पावसाचे प्रदीर्घ खंड व सरासरीच्या तुलनेत साठ टक्केच पाउस झालेल्या मराठवाड्यात यंदा जलसंकटाने होरपळ वाढविणे सुरू केली आहे. औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र आहेत. पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात टंचाई निवारण्यासाठी 2199 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये सुरू असलेल्या 1627 टॅंकरला पाणीपुरवठा करण्यासाठी 762 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. याशिवाय टॅंकरव्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित केलेल्या 1437 विहिरींचा समावेश आहे.
जिल्हानिहाय टॅंकरची संख्या
औरंगाबाद ... 780
जालना ... 277
परभणी ... 05
हिंगोली ... 16
नांदेड ... 28
बीड .. 470
लातूर ... 04
उस्मानाबाद ... 47
दृष्टिक्षेपात दुष्काळ
- 33 लाख 22 हजार लोकांची तहान टॅंकरवर
- 1627 टॅंकरने पुरविले जाते आहे पिण्याचे पाणी
- 1240 गावे व 397 वाड्या करताहेत पाणीटंचाईचा सामना
- टॅंकरव्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी 1437 विहिरींचे अधिग्रहण
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.