लातूर, उस्मानाबादचा वॉटरग्रीडचा  प्रस्ताव सप्टेंबरमध्ये सादर करणार 

Sambhaji patil Nilangekar
Sambhaji patil Nilangekar

लातूर, ता. 20 ः लातूर जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता पाहता मराठवाडा वॉटरग्रीडच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्याचा समावेश करावा, अशी मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली होती. त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भात प्रस्ताव दाखल करावा, त्यास तत्काळ मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्याची माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. 


मागच्या वर्षी आणि यंदाही लातूरसह मराठवाड्याच्या बहुतांश भागांत समाधानकारक पाऊस झाला नाही. मराठवाडा हा कायम दुष्काळाच्या छायेत असणारा प्रदेश आहे. त्यातही लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांना दुष्काळाची झळ अधिक प्रमाणात बसते. वॉटरग्रीड प्रकल्पात या दोन जिल्ह्यांचा शेवटच्या टप्प्यात समावेश करण्यात आलेला आहे. पण ज्या भागाला सर्वाधिक झळ बसते त्या भागाला या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली होती, असे श्री. निलंगेकर म्हणाले. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायमच मराठवाड्याला दुष्काळी स्थितीतून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. लातूर व उस्मानाबादच्या वॉटरग्रीडच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मंजुरी देण्याची ग्वाही दिली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्याच टप्प्यात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा वॉटरग्रीड प्रकल्पात समावेश होणार आहे, अशी माहिती श्री. निलंगेकर यांनी दिली. 
लातूर जिल्ह्याला या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. लातूर शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागांत असणारी पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर होणार आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्याची वाटचाल समृद्धतेकडे होणार आहे, असा आशावादही श्री. निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com