मराठवाड्याच्या घशाला काेरड

Marathwada-Water-Project
Marathwada-Water-Project

धरणांत केवळ ३.२५ टक्‍केच पाणी; पिण्याच्या पाण्याचे संकट गडद
औरंगाबाद - यंदा अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील सर्व ८७२ धरणांत केवळ ३.२५ टक्‍केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सूर्य आग ओकत असतानाच धरणातील पाणीसाठा किरकोळ स्वरूपात शिल्लक राहिल्याने येत्या काळात पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्‍त होत आहे.

मराठवाड्यात गतवर्षी एप्रिलमध्ये मोठ्या धरणांत तब्बल २४ टक्‍के पाणीसाठा होता; मात्र यंदा पावसाने दगा दिल्याने पाणीपातळीत मोठी घटच होत आहे. मोठ्या, मध्यम व लघुप्रकल्पांसह गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये केवळ ३.२५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. अकरा मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा ३.४६ टक्‍क्‍यांवर आला आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत दीड हजाराच्या आसपास सुरू असलेले टॅंकर व विहिरी अधिग्रहणाच्या प्रमाणावरून भूजलस्थिती स्पष्ट होते. 

३५ मध्यम प्रकल्पांत तीन टक्‍के पाणी
मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ३ टक्‍के पाणीसाठा आहे. तर, जालना जिल्ह्यातील ७, परभणी जिल्ह्यातील २ प्रकल्पांत पाण्याचा थेंबही नाही. गतवर्षी मध्यम प्रकल्पांत एप्रिलमध्ये २२ टक्‍के पाणी होते.

मराठवाड्यात अत्यल्प पाऊस झाल्यानंतरच प्रशासनाने पिण्यासाठी, जनावरांसाठी पाण्याची सोय करायला हवी होती; मात्र तसे झाले नाही. आज वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक, महिलांना आपल्या लेकरांसह रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. निसर्गासोबतच प्रशासनानेदेखील दगा दिला, असेच म्हणावे लागेल.
- मदन महाराज शिंदे, शेतकरी, मानवत, जि. परभणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com