जायकवाडी धरणाचा पाणीसाठा पोहचला 15 टक्क्यांवर

Jayakwadi Dam
Jayakwadi Dam

कायगाव : मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नसला तरी नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या कृपेने जायकवाडी धरणातील पाणीसाठा १५ टक्क्यांवर पोहोचला आहे. 

मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेले हे जायकवाडी आठवडाभरापूर्वी मृत साठ्यात होते. सध्या जायकवाडी धरणात गोदावरी नदीपात्रातून जवळपास ७० हजार क्यूसेक्स इतकी आवक सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यात असाच दमदार पाऊस सुरू राहिला तर औरंगाबाद, जालना या शहरासोबत औरंगाबाद, जालना, नगर या जिल्ह्यातील जवळपास चारशे गावांची वर्षभराची चिंता मिटणार आहे. राज्यातील बहुतांश भागांत जोरदार पाऊस होत असताना अजूनही मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com