पंचवीस वर्षांतल्या चुका २५ दिवसांत कशा सुधारणार?

Nipun-Vinayak
Nipun-Vinayak

औरंगाबाद - शहरातील पाणीपुरवठ्यात गेल्या २५ वर्षांत अनेक चुका झाल्या आहेत. त्या मी २५ दिवसांत कशा सुधारणार, असा सवाल सवाल महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी आंदोलनकर्त्या महिलांना केला. 

शहरातील सुमारे १५ लाख नागरिकांना पाणी पुरविताना महापालिकेच्या नाकीनऊ येत आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांच्या माध्यमातून गरजेपेक्षा निम्मेच पाणी मिळत असल्याचे महापालिकेने नियुक्त केलेले अभ्यासक राजेंद्र होलाणी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासनाने जुन्या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर दिला आहे. नव्या लाइन टाकताना गुंठेवारी वसाहतींना (नो नेटवर्क एरिया) वगळण्यात येत आहे. सोमवारी गुंठेवारी भाग असलेल्या न्यू हनुमाननगरातील महिलांनी आंदोलन केले. यावेळी आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शहराची वाढती गरज व येणारे पाणी याबाबत चिंता व्यक्त केली. पाणीपुरवठा योजनेत गेल्या २५ वर्षांत अनेक चुका झाल्या आहेत. त्या मी २५ दिवसांत कशा सुधारू शकतो? असा सवाल त्यांनी आंदोलनकर्त्या महिलांना केला.

...तोपर्यंत मिळेल
एका महिलेने पाण्याची वाट पाहून मी म्हातारे झाले, आता तरी पाणी मिळणार का? असा प्रश्‍न आयुक्तांना केला. त्यावर आयुक्तांनी तुम्ही अद्याप म्हाताऱ्या झाल्या नाहीत. म्हाताऱ्या होईपर्यंत पाणी मिळेल, असा दावा केला. 

वाहतेय पाणी
पाण्याच्या टाक्‍या भरल्यानंतरही कोणी वॉल्व्ह बंद करण्याची तसदी घेत नाही. त्यामुळे पाणी वाया जाते. मी अनेक टाक्‍या पाहिल्या त्या ठिकाणी असेच चित्र आहे, असे आयुक्तांनी महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेते विकास जैन यांना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com