पहाटे आले शहरात पाणी...

Water-Supply
Water-Supply

औरंगाबाद - बारा तासांच्या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते; मात्र प्रत्यक्षात नागरिकांना शनिवारी (ता. २९) दुपारपर्यंत पाण्याची वाट पाहावी लागली. शटडाऊनचा वेळ वाढल्यामुळे शहरात पाणी येण्यासाठी पहाटे साडेचार वाजल्याचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सांगितले. 

महापालिकेच्या जायकवाडी व फारोळा येथील विद्युतपंपाचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. या ठिकाणी रिंग मेन युनिटचे काम करण्यासाठी शटडाऊनची मागणी महापालिकेला केली होती. त्यानुसार शुक्रवारी (ता. २८) बारा तासांचे शटडाऊन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी आठ ते रात्री आठ अशी शटडाऊनची वेळ ठरली होती; मात्र रात्री नऊ व दहा वाजता फारोळा, जायकवाडी येथे वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर पहिला पंप सुरू करण्यात आला; मात्र संपूर्ण पंप सुरू करून शहरात पाणी येण्यासाठी पहाटेचे साडेचार वाजले. त्यानंतर ज्या भागात पाणी देण्याचे नियोजन होते, त्या भागातील पाण्याच्या टाक्‍या भरून घेत दुपारी नळाला पाणी देण्यात आले. दरम्यान, शटडाऊनच्या काळात महापालिकेनेदेखील अनेक ठिकाणी पाण्याच्या गळत्या बंद केल्या. व्हॉल्व्हची दुरुस्ती करून घेण्यात आली.

पदाधिकारी करणार पाहणी
जायकवाडी धरणातील पाणीपातळी खोलवर जात असल्यामुळे आगामी काळात काय उपाययोजना कराव्या लागतील, याचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (ता. दोन) महापौरांसह पदाधिकारी पाहणी करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com