काय म्हणाले जिपचे उपाध्यक्ष

nandedzp
nandedzp

नांदेडः  राज्याच्या राजकीय पटलावर मोठे फेरबदल झाले. याचा परिणाम आगामी काळात होवू घातलेल्या जिल्हा परिषद निवडीवर होण्याचा तर्क लावण्यात येत आहे. पण माजी आमदार प्रदिप नाईक यांनी राष्ट्रवादी सोबतच राहण्याची स्पष्ट भुमिका जाहीर केल्याने जिल्हा परिषदेत बहूमताचे संख्याबळ सत्ताधारी कॉँग्रेस- राष्ट्रवादीकडे राहणार आहे. याशिवाय पूर्वीच्या संख्याबळात वाढ होण्याचे संकेत देत बदलत्या राजकीय समीकरणांचा जिल्हा परिषदेत परिणाम होणार नाही, या उलट सत्ताधारी कॉँग्रेसचे संख्याबळ वाढणार असल्याचा गौप्यस्फोट जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी केला.


राज्यस्तरावर सत्तास्थापनेचा पेच कायम असताना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अध्यक्ष, महापौरपदांच्या मुदती संपल्यामुळे मंगळवारी (ता.१९) राज्यस्तरावरून जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. त्यानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या महिलासाठी राखीव ठेवण्यात आले.


दरम्यान, शनिवारी राज्याच्या सत्तापटलावरील मोठ्या घडामोडीचा जिल्हा परिषदेत होवू घातलेल्या अध्यक्ष निवडीवर परिणाम होण्याचे तर्क लावण्यात येवू लागले. पण जिल्हा परिषदेतील बहूमताचे संख्याबळ सत्ताधारी कॉँग्रेस- राष्ट्रवादीकडे कायम असल्याचे माजी आमदार प्रदिप नाईक यांच्या भुमिकेवरून स्पष्ट केली. त्यामुळे राज्यस्तरावरील घडामोडींचा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवर परिणाम होणार नसल्याचा दावा उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी केला आहे.

असे आहे संख्याबळ


जिल्हा परिषदेच्या एकून ६३ जागांच्या पक्षीय बलानुसार कॉँग्रेस-२८, भाजप- १३, शिवसेना- १०, राष्ट्रवादी-१०, रासप एक व अपक्ष एक असे संख्याबळ आहे.

बहूमताचा जादूई आकडा कॉँग्रेसकडे


खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गटाचे शिवसेनेमधील चार तर बापुसाहेब गोरठेकर यांच्या गटाचे तीन व राजेश देशमुख यांच्यासह भाजपकडे २१ तर रासप, अपक्ष प्रत्येकी एक असे २३ चे संख्याबळ आहे. दरम्यान, राज्यस्तरावरील घडामोडीनंतर जिल्हा परिषदेत सत्तांतराचे तर्क सुरू झाले. पण जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल लक्षात घेता सत्ताधारी कॉँग्रेसकडे २८ चे संख्याबळ आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे संख्याबळ चारने घटले तरी बहूमताचा जादूई आकडा कॉँग्रेसकडे आहे.

कॉँग्रेसचे सभागृहातील संख्याबळ वाढणार


जाहीर झालेल्या आरक्षणानुसार केवळ कॉँग्रेसकडे अध्यक्षपदाचे चार ते पाच दावेदार आहेत. त्यातच माजी आमदार प्रदिप नाईक यांनी सेक्युलर विचार आणि पक्षनिष्ठा कायम असल्याचे जाहीर केले. त्यामुळे राज्यस्तरावरील घडामोडींचा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवर तुसभरही परिणाम होणार नाही. सत्ताधारी पक्षाचे सभागृहातील सर्व शिलेदार पक्षाशी बांधील राहतील, या उलट कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढणार असल्याचा गौप्यस्फोट करून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी तर्क-वितर्कांना शनिवारी पुर्णविराम दिला.    

 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com