कंटेनर-रिक्षा अपघातात नाशिकच्या मृत्यू

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - भरधाव कंटनेर व रिक्षाच्या धडकेत रिक्षातील प्रवासी महिलेचा मृत्यू झाला; तर चारजण गंभीर जखमी झाले. शनिवारी (ता. 24) दुपारी तीन वाजता पैठण लिंक रस्त्यावरील कांचनवाडी येथे हा अपघात झाला. लीलाबाई प्रल्हाद दावरे (वय 50) असे मृताचे नाव असून, शीतल गौतम दावरे (32), आरुषी (6), आराध्या (8, सर्व रा. ज्ञानेश्‍वरनगर, नाशिक) व सुशील खेडेकर (वय 25, रा. औरंगाबाद) हे जखमी झाले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथील लीलाबाई यांचा मुलगा गौतम हा नोकरीनिमित्त चितेगावात राहतो. त्यांना भेटण्यासाठी लीलाबाई यांच्यासह गौतमची पत्नी व दोन मुली काही दिवसांपूर्वीच त्याच्याकडे आल्या होत्या. भेट झाल्यानंतर त्या शनिवारी नाशिकला परत जाणार होत्या. त्यासाठी दुपारी रेल्वेस्टेशनकडे जाण्यासाठी रिक्षातून निघाल्या होत्या.

आई, पत्नी, मुलींना रिक्षात बसवून गौतम त्याच्या दुचाकीने रेल्वेस्टेशनकडे निघाले. कांचनवाडीजवळील मुंबई हायवे टी-पॉइंटजवळ एएस क्‍लबकडे जाणाऱ्या कंटेनरने (सीजी 04, एमक्‍यू 0872) रिक्षाला धडक दिली. धडकेत गंभीर जखमी झालेल्या सर्वांना गंभीर अवस्थेत स्थानिकांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान, लीलाबाई यांचा मृत्यू झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com