लातूरमध्ये कामगार, कर्मचारी संपावर

Strike In Latur
Strike In Latur

लातूर ः केंद्र सरकारची जनविरोधी धोरणे आणि प्रलंबित मागण्यासाठी बुधवारी (ता.आठ) कामगार संघटनांच्या वतीने भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते.या बंदला जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला. बॅंका बंद राहिल्याने अनेकाची अडचण झाली. बॅंक कर्मचार्यांनी मोर्चा काढून निदर्शने केली.

केंद शासन कामगार विरोधी धोरणे राबवत आहे.  कामगारांचे अनेक प्रश्र्न प्रलंबित आहेत.  कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबीत समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (ता.8) देशव्यापी संपाचे आयोजन करण्यात आले होते. अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, पाच दिवसांचा आठवडा करावा,महिला कर्मचार्यांना दोन वर्षांचे  बालसंगोपन रजा मंजुर करावी, अनुकंपा भरती विना अट करावी, कंत्राटी आणि बदली कामगारांना सेवेत कायम  करावे, सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांच्या एका वारसाला पूर्वीप्रमाणे शासकीय सेवेत भरती करावे,  विना अनुदान धोरण रद्द करावे आदी मागण्या कर्मचार्यांच्या आहेत.

बॅंक विरोधी धोरणे राबवले जात असल्याने बॅंक कामगारात असंतोष आहे. या कामगारांनी शहरात मोर्चा काढून निदर्शने केली. जिल्हा परिषद सोडून इतर शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत.

ज्येष्ठ नागरिक कायदाच झाला म्हातारपणाची काठी!
म्हातारपणाची काठी असलेल्या मुलांनी सांभाळण्यास नकार दिल्यानंतर अनेकांवर उपासमारीचे व मंदिरात राहून दिवस काढण्याची वेळ येते. काहींवर तर आत्महत्याही करण्याची वेळ येते, अशा वेळी "आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 नुसार (ज्येष्ठ नागरिक कायदा)' हा अनेक ज्येष्ठांचा आधार झाला आहे. या कायद्यानुसार उतारवयात सांभाळ न करणाऱ्या पती व मुलांकडून पोटगी मागण्याचा अधिकार ज्येष्ठ नागरिकांना आहे. मागील दोन महिन्यांत उपविभागीय अधिकारी सुनील यादव यांनी पाच प्रकरणात ज्येष्ठांना पोटगी मंजूर केली आहे.


पती व मुलाकडून महिलेला पोटगी
निवळी (ता. लातूर) येथील शामलबाई शंकरराव सोनपेठकर (वय 73) यांनी पती शंकरराव तसेच मुलगा कुलभूषण यांच्याकडून पोटगी मिळण्यासाठी अर्ज केला होता. उत्पन्नाचे चांगले साधन असूनही शेतकरी पती व शिक्षक मुलगा कुलभूषण सांभाळत नसल्याची त्यांची तक्रार होती. हा आरोप दोघांनी फेटाळला. शेती तलावात गेल्याने काहीच उत्पन्न मिळत नसल्याचे शंकरराव यांनी, तर कर्जाच्या परतफेडीमुळे दरमहा पगाराचे आठ हजार रुपयेच हाती उरत असल्याचे कुलभूषणने सांगितले. दोघांनीही हालाखीचे जीवन जगत असल्याचा दावा केला; मात्र दोघांचीही पोटगी देण्याची ऐपत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर यादव यांनी हा दावा फेटाळून लावत पती शंकरराव व कुलभूषण यांनी अर्जदार शामलबाई यांना दरमहा प्रत्येकी चार हजार रुपये अशी आठ हजार रुपये पोटगी द्यावी, असे आदेश दिले.


सधन मुलांनी वडिलांना पोटगी द्यावी
रायवाडी (ता. लातूर) येथील विठ्ठल केशव पवार (वय 70) यांनी मुलगा ज्ञानेश्वर व तुकाराम यांच्याकडून दरमहा वीस हजार रुपये पोटगी देण्याची मागणी केली होती. मुले पत्नीचा सांभाळ करतात; मात्र माझा सांभाळ करीत नाहीत. माझ्या मिळकतीचा उपभोग घेऊन पत्नी व मुले संगनमताने त्रास देतात. मुलांनी घरातून हाकलून दिले असून मंदिरात व नातेवाइकांकडे राहून जीवन कंठीत असल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले. सुनावणीत मुले सधन असल्याचे निदर्शनास आले. दोन्ही मुलांनी वडिलांचा सांभाळ करण्याची हमी दिली. त्यानंतर यादव यांनी वडिलांना दोन्ही मुलांनी प्रत्येकी दोन हजार रुपये पोटगी उदरनिर्वाह व औषध खर्चासाठी द्यावी, असे आदेश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com