कोकण कड्याखाली अडकलेल्या 17 पैकी 15 गिर्यारोहकांची सुटका

कोकण कड्याखाली अडकलेल्या 17 पैकी 15 गिर्यारोहकांची सुटका

मुरबाड (ठाणे) : हरिश्चंद्र गडावरील कोकण कड्याखाली रविवारी सायंकाळ पासून थांबलेल्या 17 पैकी 15 गिर्यारोहकांना मुरबाड तालुक्यातील वालीवरे येथे सोमवारी दुपारी सुखरूप आणण्यात आले आहे.

कल्याण येथील 7 पुरुष व 4 महिला अशा 11 जणांचा एक गट व औरंगाबाद येथील 5 पुरुष व एक महिला अशा सहा जणांचा एक गट असे एकूण 17 गिर्यारोहक कोकण कड्याकडून मुरबाड तालुक्यातील वालीवरे गावी उतरण्यासाठी रविवारी निघाले होते.  रविवारी सायंकाळी त्यांचे जवळील दोर कमी पडला अाणि अंधार पडू लागल्याने कोकण कड्याच्या 800 फूट खालच्या भागात ते थांबले होते. त्यांचे पैकी एकाने 17 जण तेथे अडकले असल्याचे काळविल्याने त्यांची सुटका करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
त्यांचे सुटके साठी एनडीआरएफचे पथक, टोकावडे पोलीस ठाण्याचे ननावरे पोलीस, वन विभागाचे कर्मचारी वालीवरे येथून कोकण कड्याकडे सोमवारी सकाळी रवाना झाले तर मुरबाडचे नायब तहसीलदार हनुमंत जगताप वालीवरे येथून या कामावर देखरेख ठेऊन आहेत .

कोकण कड्याच्या खाली असलेल्या 15 जणांना दुपारी वालीवरे येथे आणण्यात आले आहे. उर्वरित दोघांना सायंकाळ पर्यंत खाली आणण्यात येणार आहे. हरिश्चंद्र गडाचा परिसर ठाणे, पुणे व नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर आहे. कड्याच्या खालचा वालीवरे गावाच्या जंगलातील भाग ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात, गडावर जाण्यासाठी वाट पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटा पुढील खुबी खिरेश्वर गाव टोलार खिंड मार्गे आहे. त्यापुढील भाग नगर जिल्ह्याच्या हद्दीत येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com