अलिबाग (बातमीदार) : पावसाळ्यात अरबी समुद्रात वारंवार वादळे निर्माण झाली. यामुळे रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांना रिकाम्या हाताने किनारा गाठावा लागला. याचदरम्यान बोटींचेही नुकसान झाले. त्यामुळे अनेक मच्छीमार देशोधडीला लागले आहेत. या अस्मानी संकटामुळे सुमारे २०० कोटींचा आर्थिक फटका बसल्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, उरण तालुक्यांतील मच्छीमार मोठ्या संख्येने खोल समुद्रातील मासेमारी करतात. या वर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून बंदी आणि नंतर आलेल्या वादळांमुळे त्यांना मासेमारी करता आली नाही. वादळाच्या तडाख्यात बहुसंख्य बोटींचेही मोठे नुकसान झाले. त्यानंतर पावसाळा सरताना वाळत ठेवलेली मासळीही अवेळी पावसामुळे भिजली. हे नुकसानही मोठे आहे.
मच्छीमार संस्थांच्या म्हणण्यानुसार खलाशी, महिला मासेविक्रेत्या, मासे सुकविणाऱ्या महिला, जाळी विणणारे कामगार यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे भरपाई मिळावी, यासाठी जिल्ह्यातील ९० टक्के मच्छीमार संस्थाचे प्रस्ताव सरकारकडे पाठण्यात आले आहेत.
जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघाच्या वतीने गुरुवारी मत्स्य व्यवसाय आयुक्त यांना एक अब्ज ९६ कोटी ४८ लाख २१ हजार ५०० रुपयांचे नुकसानाची माहिती दिली असून ही नुकसानभरपाई तत्काळ द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून मच्छीमारांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील मच्छीमार सोसायट्यांनी नुकसानीचा आढावा घेऊन त्याचा अहवाल तयार केला आहे. त्यानुसार सरकारने त्याची दखल घेत नुकसान भरपाई द्यावी.
- शेषनाथ कोळी, अध्यक्ष, रायगड जिल्हा मच्छीमार संघ
वर्षातील सहा महिने परिवारासोबत कर्नाटकमध्ये रोजगारासाठी असतो. त्यामुळे या कालावधीत घर बंद असते. त्यामुळे कुलपे खरेदी करावी लागतात.
- सुलभा जाधव, ग्राहक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.