रस्तोरस्ती ज्ञानाेबा-तुकारामचा गजर 

रस्तोरस्ती ज्ञानाेबा-तुकारामचा गजर 

रोहा : त्रिपुरारी पौर्णिमेनंतर जिल्ह्यातील वारकऱ्यांना आळंदीचे वेध लागले आहेत. जिल्हाभरातून 150 ते 200 पायी दिंड्यांचे ज्ञानबा-तुकारामाच्या घोषात आळंदीच्या दिशेने प्रस्थान सुरू झाले आहे. 

जिल्ह्यतील शेतकरी खरीप हंगामातून मुक्त झाला आहे. त्यामुळे त्याला ज्ञानोबा माऊलीचे वेध लागले असून वारकरी पायी दिंडीला निघाले आहेत. वाटेत "ज्ञानोबा माऊली तुकाराम' असा जयघोष करीत तहान-भूक विसरून भर उन्हातून मार्गक्रमण सुरू आहे. जिल्हाभरातून सुमारे 100 ते 150 विविध वारकरी मंडळाच्या दिंड्या दरवर्षी भागवत एकादशीनिमित्त आळंदीला पोहोचतात, अशी माहिती वारकऱ्यांनी दिली. 
दिंडीत वारकरी भल्या पहाटे चालण्यास सुरुवात करतात. रोज किमान 20 ते 30 किलोमीटर अंतर चालतात. वाटेत मुक्कामी भजन-कीर्तनाचे कार्यक्रम होतात. उरण येथून निघणारी गोपाळकाला उरणकर, डोलवी येथून निघणारी नामदेव बाबा डोलवीकर, गडब येथून निघणारी नारायण बाबा गडबकर, रोह्यातून निघणारी पुरुषोत्तम महाराज रोहेकर, भाल, विठ्ठलवाडी येथून निघणारी विठ्ठल-रुख्मिणी वारकरी मंडळ व तळवलीतर्फे अष्टमी येथून निघणारी मारुती महाराज कोलटकर या प्रमुख दिंड्यांपैकी मानल्या जातात. 

या सगळ्या दिंड्या बोरघाट, ताम्हिणी घाट अशा वेगवेगळ्या मार्गे दशमीला आळंदी येथे पोहोचतात. एकादशीला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन वारकरी कृतकृत्य होतात. 

रायगड जिल्ह्याला वारकरी संप्रदाय व वारीची मोठी परंपरा आहे. जिल्ह्यातून निघणाऱ्या काही दिंड्यांना 50 वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. जिल्ह्यातून 100 ते 150 दिंड्या निघतात. 
- पुरुषोत्तम महाराज रोहेकर 
..................... 
कोलाड : नामस्मरणात रममाण संभे ते आळंदी पायी दिंडीतील वारकरी.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com