२४ तास पाण्याचा नळ बंदच?

२४ तास पाण्याचा नळ बंदच?

मुंबई - मुंबईला २४ तास पाणी पुरवण्याच्या प्रयोगात पुन्हा एकदा अपुऱ्या पावसाने खोडा घातला आहे. कमी पाणीसाठ्यामुळे उन्ह्याळ्यात असा प्रयोग करण्याबाबतचे नियोजन करणे अवघड असल्याचे महापालिकेच्या पाणी खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. पालिकेची शेवटची अपेक्षा असलेल्या परतीच्या पावसानेही दगा दिला आहे.

पालिकेने वांद्रे, सांताक्रूझ आणि खारबरोबर मुलुंडमध्ये पाण्याच्या वेळा वाढवल्या आहेत. टप्प्याटप्प्याने पाण्याच्या वेळा वाढवून २४ तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात संपूर्ण मुंबईत २४ तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मात्र, मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये ऑक्‍टोबरच्या सुरुवातीला आवश्‍यकतेपेक्षा एक लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी होता. त्यामुळे उन्हाळ्यात तलावांची पातळी कमी झाल्यावर नियोजन करण्यात अडचणी येऊ शकतात, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचा प्रयोग थांबवावा लागण्याची शक्‍यता आहे. मुलुंड-वांद्र्यातील प्रयोग थांबल्यास त्याचा परिणाम भविष्यातील २४ तास पाण्याच्या प्रयोगावरही होऊ शकतो. मॉन्सूनने दगा दिल्यामुळे परतीच्या पावसावर पालिकेची मदार होती. किमान ३० ते ४० हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा वाढला असता तरी पालिकेला दिलासा मिळाला असता.

पुन्हा पावसाचा दगा
२००९ मध्ये पालिकेने मुलुंडपासून घाटकोपरपर्यंतच्या काही भागांत २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रयोग सुरू केला होता. मात्र, तेव्हाही अपुऱ्या पावसामुळे मुंबईत वर्षभर १० ते १५ टक्के कपात होती. परिणामी पाण्याचा प्रयोग थांबवावा लागला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com