मध्य रेल्वेचे २८० पूल अहवालाच्या प्रतीक्षेत 

मध्य रेल्वेचे २८० पूल अहवालाच्या प्रतीक्षेत 

मुंबई -  मध्य रेल्वेतर्फे दरवर्षीप्रमाणे पादचारी आणि रस्त्यांवरील पुलांचे सुरक्षा ऑडिट करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईने केलेल्या पाहणीचा अहवाल मिळालेला नाही, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मध्य रेल्वेने दिली आहे. ऑडिटवर तीन कोटी ३७ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र, अद्याप २८० पूल अहवालाच्या  प्रतीक्षेत आहेत.

गलगली यांनी मध्य रेल्वेकडे पुलांच्या सुरक्षा ऑडिटबाबत माहिती मागितली होती. मध्य रेल्वे दर वर्षी पावसाळ्यापूर्वी आणि नंतर पादचारी व रस्त्यांवरील पुलांचे सुरक्षा ऑडिट करते. त्यानुसार ऑगस्ट २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान १९१ पादचारी आणि ८९ रस्त्यांवरील पुलांचे सुरक्षा ऑडिट आयआयटी मुंबईतर्फे करण्यात आले. त्या पाहणीचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. पाहणी कामासाठी ठरवण्यात आलेल्या तीन कोटी ३७ लाख ८०० रुपयांतील ५० टक्के रक्कम म्हणजे एक कोटी ६८ लाख ५० हजार ४०० रुपये अदा करण्यात आले आहेत, असा तपशील गलगली यांना देण्यात आला आहे. आयआयटी मुंबईने टप्याटप्याने सुरक्षा अहवाल देणे आवश्‍यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा ऑडिटवर पैसे खर्च केले जातात; मात्र अहवाल वेळेत मिळत नाही. त्यामुळे सुरक्षा अहवाल ऑनलाईन प्रसिद्ध करावेत, अशी मागणी गलगली यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल  यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com