लोकसभा 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात आज सकाळी 7 वाजेपासून शांततेत मतदानास सुरवात झाली. सकाळी 7 ते 11 या कालावधीत सरासरी 13.75 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात पुढीलप्रमाणे मतदान झाले आहे. वर्धा 15.76%, रामटेक (अ.जा.) 9.82%, नागपूर 17.56%, भंडारा-गोंदिया 12.2%, गडचिरोली-चिमूर (अ.ज.) 18.01%, चंद्रपूर 10.86% आणि यवतमाळ-वाशिम 12.06% असे मतदान झाले.
विदर्भातील 7 लोकसभा मतदारसंघात सुरु असलेल्या मतदानावेळी अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम बिघाडाबाबत 39 तक्रारी आल्या आहेत.
प्रदेश काँग्रेसच्या वॉर रुमने यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल केली आहे.
या लोकसभा मतदारसंघातून EVM बिघाडाबाबत तक्रारी आल्या आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.