'या' जिल्ह्यात परराज्यातील 5 हजारपेक्षा जास्त कामगारांची राहण्या-खाण्याची व्यवस्था

sheltar
sheltar

पालघर : लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील विस्थापित झालेल्या कामगारांसाठी 44 निवारागृहे सुरु करण्यात आली आहेत. यामध्ये 5 हजार 524 कामगार वास्तव्य करत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली. 

कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन सुरू केल्यामुळे बेघर, विस्थापित, परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी जिल्ह्यात आजपर्यंत 44 निवारागृहे स्थापन करण्यात आली आहेत.  यापैकी 8 निवारागृहे ही सरकारतर्फे चालवण्यात येत असून त्यामध्ये 851 मजूर आहेत. तर एक निवारागृह हे सामाजिक संस्थेतर्फे चालवण्यात येत असुन त्यामध्ये 127 मजूर आहेत. औद्योगिक आस्थापनांतर्फे 28 निवारागृहे सुरू असून त्यामध्ये 4 हजार 258 मजूर निवास करत आहेत. वसई-विरार महापालिकेतर्फे 7 निवारागृहे सुरू असून  यामध्ये 288 मजूर आहेत. कोकण विभागचे विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांच्या निर्देशानुसार या निवारागृहांची विविध खात्याच्या अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी सांगितले. 

कम्युनिटी किचनमधून जेवण
वसई व पालघर तालुक्यात गरजूंना 16 सरकारी कम्युनिटी किचनमधून, तर 10 सामाजिक संस्थेच्या कम्युनिटी किचनतर्फे सरासरी 55 ते 60  हजार गरजूंना दिवसातून दोन वेळा जेवण देण्यात येत आहेत. त्यांचीही तपासणी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली.

 Accommodation, meals etc. facilities for 5524  workers

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com