विक्रमगडमध्ये  "कार्टुली' महाग असूनही तेजीत

कार्टुली
कार्टुली

मुंबई : पावसाळी हंगामात येणारी आणि सर्वांनाच आवडणारी कार्टुली (रानभाजी) विक्रमगड बाजारात दाखल झाली आहे. या भाजीची आवक अजूनही कमीच असल्याने सध्या ही भाजी १०० रुपये किलो दराने विकली जात आहे. परंतु, महाग असूनही कार्टुलीची खरेदी जोरात आहे. 
येत्या पंधरवड्यात बाजारात कार्टुलीची आवक वाढल्यावर त्याचा भाव ७० ते ८० रुपये किलो होईल. त्या वेळेस या भाजीचा भाव ७० ते ८० किलो असेल. ही भाजी सर्वांची आवडती असल्याने तिची जोरात खरेदी होते. त्यामुळे येथील स्थानिकांना यापासून रोजगारनिर्मिती होते. 
पोटापाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी अनेक आदिवासी स्त्री-पुरुषांचा घोळका कार्टुली शोधण्यासाठी दररोज एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात टोपली घेऊन जंगल अक्षरशः पिंजून काढतो. जंगल पिंजून झाले की जमवलेली रानभली अर्थात कार्टुली बाजार गाठून दिवसभर विकली जाते. सुरुवातीला त्यांना चांगला भावही मिळतो. ही भाजी गोळा करताना कित्येकदा त्यांना सापासारख्या प्राण्यांशी मुकाबला करावा लागतो. 

हंगाम संपेपर्यंत ग्राहक 
कार्टुली किंवा कंटवली या नावाने ही भाजी ओळखली जाते. बाहेरून हिरवीगार दिसणारी आणि साधारण हाताला न लागणाऱ्या या काटेरी भाजीची चव व स्वाद काही औरच असतो. रुचकर असल्याने ही सर्वांचीच आवडती भाजी आहे. त्यामुळे या भाजीला हंगाम संपेपर्यंत ग्राहक असतोच. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com