हत्येच्या आरोपातून तिघे निर्दोष

हत्येच्या आरोपातून तिघे निर्दोष


ठाणे : गणेशपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या हत्येच्या गुन्ह्यात अडकलेल्या तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. बी. बहलकर यांनी बुधवारी दिला; तर तपास अधिकारी यांच्याकडून नुकसानभरपाई म्हणून एक रुपया द्यावा. या निर्दोष आरोपींनी न्यायालयात केलेल्या मागणीवर न्यायमूर्ती बहलकर यांनी पोलिस अधिकारी याच्या वेतनातून प्रत्येकी १ रुपया नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावा, असा निर्णय दिला. या खटल्यात सरकारी वकील वर्षा चंदने यांनी युक्तिवाद केला; तर बचाव पक्षाच्या वतीने ॲड. कैसर अन्सारी यांनी युक्तिवाद केला. 

इकबाल ऊर्फ पप्पू जमील सय्यद (रा. गंगाडिया पाडा, वसईफाटा, वसई) हा  ७ जानेवारी २००७ रोजी बेपत्ता झाला. त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी ८ जानेवारी रोजी मोरी, गणेशपुरी परिसरात सापडला. गणेशपुरी पोलिसांनी नालासोपारा पोलिसांना सूचना दिल्यानंतर सय्यद कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटविली. मृतकाचे वडील जमील यांच्या जबाबावरून सत्यनारायण, शंकर, संजय, संतोष आणि वीरेंद्र यांना अटक केली. दरम्यान गणेशपुरी पोलिस मात्र नंबी तेवर याला शोधू शकले नाहीत. पाच महिन्यानंतर आरोपीची जामिनावर सुटका झाली. त्यांची नार्को चाचणी करण्यात आली होती. खटला न्यायालयात सुरू असतानाच सत्यनारायण याचा मृत्यू झाला; तर मॅनेजर आणि सहआरोपी वीरेंद्र याचे अपघाती निधन झाले. 


आरोप सिद्ध करण्यास असमर्थ
सदर प्रकरणाची अंतिम सुनावणी ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. बी. बहलकर यांच्या न्यायालयात सुरू होती. दरम्यान न्यायालयात सरकारच्या वतीने युक्तिवाद सरकारी वकील चंदने यांनी केला; तर न्यायालयात तपास अधिकारी आर. बी. मोरे हे सक्षम पुरावे सादर करू शकले नाहीत. तेव्हा आरोपी संजय, शंकर आणि संतोष यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश बुधवारी न्या. बहलकर यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com